Cyclone Sitrang: पूर्व किनारपट्टीवरील सितरंग चक्रीवादळाची तीव्रता वाढली, पश्चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांना हाय अलर्ट

140

भारताच्या पूर्व किनारपट्टीवर वादळाचे संकट ओढावल्यामुळे पूर्व आणि इशान्येकडील राज्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सितरंग चक्रीवादळ तयार झाले असून त्याची तीव्रता वाढळी आहे. याचा परिणाम म्हणून पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून राज्यात हाय अलर्ट देण्यात आला आहे.

हे चक्रीवादळ बांग्लादेशातून पश्चिम बंगाल आणि हळूहळू ईशान्येकडील राज्यांकडे सरकू लागले आहे. जसजसे जमिनीकडे सरकेल तसे या वादळाची तीव्रता वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

(हेही वाचाः मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला)

एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम तैनात

दरम्यान, या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन सावधगिरीच्या दृष्टीकोनातून पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. किनारपट्टीलगत असणा-या मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून रोखलं जात आहे. सितरंग चक्रीवादळाचा सर्वात जास्त धोका पश्चिम बंगालमधील उत्तर आणि दक्षिण 24 परगणा या दोन जिल्ह्यांना बसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सतर्कता बाळगली जात आहे.

या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 90 ते 110 किमी वेगाने वारे वाहत आहेत. 25 ऑक्टोबरला हे वादळ बांग्लादेशच्या बोरिशाल परिसरातील तिनकोपा द्वीप आणि सनद्वीप या दरम्यान प्रवास करण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.