Department of Meteorology: पुढील २४ तासांमध्ये मुंबईत हलक्या पावसाचा अंदाज, कोकणातील पर्यटन रविवारपासून बंद

150
Department of Meteorology: पुढील २४ तासांमध्ये मुंबईत हलक्या पावसाचा अंदाज, कोकणातील पर्यटन रविवारपासून बंद

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील २४ तासांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील २४ तासांमध्ये कमाल तापमान ३४, तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील असंही सांगण्यात आलं आहे. रविवारपासून कोकणातील समुद्री पर्यटन पुढचे ३ महिने बंद ठेवण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळ आणि सोसाट्याचा वारा ४०-५० किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. या भागांत येत्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – देशात नक्षलवाद कधी संपुष्टात येईल? Amit Shah म्हणाले…  )

दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वार, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

३१ ऑगस्टपर्यंत पर्यटन बंद (Kokan Sea Tourism Closed)
कोकणातील समुद्रकिनारे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेण्यासाठी देशभरातून आणि राज्यभरातून अनेक पर्यटक कोकणात येत असतात. रविवारपासून ३१ ऑगस्टपासून कोकणातील पर्यटन बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तसेच मुरूड-जंजिरा किल्लाही रविवारपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात मान्सूनचे आगमन हे १० जूनपर्यंत होणार असून या ठिकाणी मासेमारीसाठीही बंदी घालण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मान्सून १० जूनच्या दरम्यान (Maharashtra Monsoon)
मान्सून प्रगतिपथावर असून निम्मे बंगालचे उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भूभाग काबीज केले आहे. मान्सूनचे आगमन ३१ मेदरम्यान केरळात, तर १० जूनदरम्यान मुंबईसह कोकणात तर १५ जूनदरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भात होऊ शकते.

रात्रीचा उकाडा जास्त जाणवण्याची शक्यता
मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रीय होऊ शकते. तसे झाल्यास सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि लगतच्या जिल्ह्यांत, मध्य महाराष्ट्र व खानदेशपेक्षा मान्सूनचे आगमन तेथे अगोदर होऊ शकते. महाराष्ट्रात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही अधिक जाणवेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.