देशमुखांनीच मला भेटायला बोलावलं; फडणवीसांचा संबंध नाही; Samit Kadam काय म्हणाले?

209
देशमुखांनीच मला भेटायला बोलावलं; फडणवीसांचा संबंध नाही; Samit Kadam काय म्हणाले?
देशमुखांनीच मला भेटायला बोलावलं; फडणवीसांचा संबंध नाही; Samit Kadam काय म्हणाले?

देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगून आपल्यासमोरील अडचणींमध्ये काही मदत होते का, अशी विनंती त्या वेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली होती. मी स्वतःहून अनिल देशमुख (Devendra Fadnavis) यांना भेटायला गेलो नव्हतो, तर देशमुखांनीच मला भेटायला बोलावलं होतं, त्यामध्ये फडणवीसांचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण समित कदम यांनी केला. समित कदम (Samit Kadam) हे मिरज येथील जनसुराज्य शक्ती युवा अध्यक्ष असून त्यांच्या नावाचा उल्लेख अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना केला होता. त्यावर समित कदम यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

(हेही वाचा – Plastic Ban : प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच राहणार का?)

काय आहे प्रकरण ?

‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर आरोप करा, मग आम्ही तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून मुक्त करू’, असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर दबाव आणला होता, असा आरोप तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांनी केला होता. देवेंद्र फडणवीसांनी त्या वेळी मित्रपक्षाचे पदाधिकारी असलेल्या समित कदम यांना पाठवल्याचेही देशमुखांनी सांगितले होते.

ईडीच्या अडचणी कमी करण्यासाठी विनंती

अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना समित कदम म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगून आपल्या अडचणी कमी करता येतात का पाहा, अशी विनंती आपल्याला अनिल देशमुखांनी केली होती. देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून आपण देशमुखांची भेट घेतली नव्हती. उलट देशमुखांनी बोलावल्यानंतर आपण त्यांची भेट घेतली होती, असे कदम म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.