Solar Eclipse : सूर्यग्रहण कसे घडते? देशातील प्रमुख शहरांमध्ये ग्रहण किती वेळ दिसणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

145

दिवाळीच्या अगदी दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ ऑक्टोबर २०२२ या दिवशी दुपारी ४.२९ ते ६.१७ वाजेपर्यंत खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. सारोस १२४ या मालिकेतील हे ग्रहण असून त्यात दर १८.११ वर्षाने येणार्‍या एकूण ७३ ग्रहणाचा समावेश आहे. हे सूर्यग्रहण वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण असून यानंतर पुढे ९ वर्षांनी भारतात केरळमधून २१ मे २०३१ रोजी कंकणाकृती आणि काश्मीर येथून २० मार्च २०३४ रोजी खग्रास सूर्यग्रहण दिसेल अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

( हेही वाचा : गुगल मॅपवर कळणार बसचे लाईव्ह लोकेशन! )

२५ ऑक्टोबरच्या ग्रहणाची सुरूवात भारतीय वेळेनुसार २.२९ वाजता आईसलँड मधून होईल, सर्वाधिक ग्रहन ४.३० वाजता रशियातील सैबेरिया येथून तर ग्रहण मोक्ष ६.३२ वाजता अरेबिअन समुद्रात होईल. हे सूर्यग्रहण उत्तर गोलार्धातून युरोप, उत्तर अमेरिका, उत्तर आफ्रिका, मध्य आशिया येथून दिसेल. उत्तर गोलार्धात ८० % सूर्य झाकाळला जाईल तर अक्षांसानुसार दक्षिणेकडे ग्रहण कमी दिसेल. भारतातून ग्रहण गुजरातमध्ये २० %, महाराष्ट्र १० % तर केरळात ३% ग्रहण दिसेल. भारतातील पूर्वेत्तर राज्य वगळता देशातील सर्व राज्यातून कमी अधिक प्रमाणात हे ग्रहण दिसेल. महाराष्ट्रातील रेखांशानुसार पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम भागात जास्त वेळ आणि जास्त मोठे ग्रहण पहावयास मिळेल.

देशात सर्वात जास्त ग्रहणकाळ गुजरात मधून भूज येथे १.४३ तास तर राजकोट येथे ग्रहण १.३६ तास दिसेल. सर्वाधिक कमी काळ कोलकाता येथून केवळ १२ मिनिटे आणि कन्याकुमारी येथे २८ मिनिटेच ग्रहण दिसेल तर पश्चिमेकडील वाराणसी, रायपुर येथे येथे ४१ मिनिटे, मात्र दिल्ली, आणि पश्चिम भारतात एक तासाच्या वर ग्रहण पाहता येइल. महाराष्ट्रात सर्वाधिक काळाचे ग्रहंन पालघर आणि मुंबई येथे एक तास २१ मिनिटे असेल तर सर्वाधिक कमी गडचिरोली येथे ४७ मिनिटे असेल. (ग्रहणाच्या वेळा खाली तक्त्यात दर्शविल्या आहेत) सर्वात मोठ्या आकाराचे ग्रहण ( चंद्र ग्रस्त भाग) १५ ते २०% गुजरात आणि राजस्तान राज्यात तर महाराष्ट्रात ८ ते १० %, दक्षिण भारतात ३ ते ५ % दिसेल.

सूर्यग्रहण कसे घडते

दर महिन्याच्या अमावास्येला सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो, परंतु ते एका रेषेत येत नाहीत. त्यांच्या कक्षेच्या प्रतलांत ५ अंशाचा फरक असतो ,त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडत नाही आणि ग्रहण होत नाही. ग्रहणात ज्या ठिकाणी चंद्राची गडद छाया पडते तिथे चंद्राच्या कमी जास्त अंतरामुळे १) खग्रास (Total) किंवा २) कंकणाकृती (Annular) ग्रहण तर उर्वरित उपछांयेच्या ठिकाणी ३) खंडग्रास ( partial) ग्रहण दिसते.४) चौथ्या प्रकारचे सूर्यग्रहण हे मिश्र प्रकाराचे (Hybrid)असते ह्यात काही भागात खग्रास तर काही भागात कंकणाकृती दिसते. हे ग्रहण दुर्मिळ असते .आताचे २५ ऑक्टोबर २०२२ ला होणारे ग्रहन हे खंडग्रास असून ग्रहनावेळी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर ३,७८,२६७ किमी तर सूर्याचे अंतर १४,८७,८०,९३० किमी असेल. ह्यानंतर ९ वर्षाने भारतात केरळ मधून २१ मे २०३१ रोजी कंकणाकृती आणि काश्मीर येथून २० मार्च २०३४ रोजी खग्रास सूर्यग्रहण दिसेल, त्यामुळे आताचे ग्रहण अवश्य पाहिले पाहिजे .

ग्रहण कसे पहावे

अतिनील किरणाच्या धोक्यामुळे सूर्यग्रहण हे कधीही उघड्या डोळ्याने, कॅमेराने , द्विनेत्रीने किंवा दुर्बिणीने सरळ न पाहता उपकरणाच्या पुढे सुरक्षित फिल्टर लावूनच पाहावे. दुर्बिणीच्या डोळ्याच्या जवळील आयपीसला फिल्टर लावू नये ह्याची काळजी घ्यावी, यामुळे तात्पुरती किंवा कायमची डोळ्याला इजा होण्याची शक्यता असते .ग्रहण पाहण्यासाठी साठी सुरक्षित सुर्य चष्मे किंवा सुरक्षित काळ्या वेल्डिंग काचेतून पाहावे. दुर्बिणीतून आणि घरच्या लहान आरश्यातून सूर्याची प्रतिमा भिंतीवर घेवून तसेच पिन होल केमेरा तयार करून ग्रहण पहावे. यावेळी पश्चिम दिशेला सूर्यास्ताचे वेळी ग्रहण असल्याने निरीक्षण शिबीर घेताना किंवा घरून ग्रहण पाहताना क्षितिजावर सूर्यास्त पाहता येईल अशी जागा निवडावी. खगोल संस्थांनी विध्यार्थ्यांना खगोल विज्ञानाची माहिती द्यावी असे सुरेश चोपणे ह्यांनी म्हटले आहे.

चंद्र-सूर्य ग्रहणे ह्या नियमित घडणाऱ्या खगोलीय घटना आहेत केवळ हां सावल्यांचा खेळ असून याचा मानवी जीवनावर आणि शरीरावर काहीही वाईट परिणाम होत नाही. उलट ह्या खगोलीय घटना विध्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांनी पाहाव्या त्याचा अभ्यास करावा आणि विश्वाचे नियम समजून घ्यावे.गरोदर स्त्रियांनी ग्रहण पाहू नये, ग्रहणात बाहेर निघू नये, जेवू  खावू नये, ग्रहण वाईट असते अशा अंधश्रद्धावर विश्वास न ठेवता ग्रहण पहावे असे आवाहन प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.

शहर ग्रहण सुरुवात अंत / मोक्ष एकूण काळ
कोलकाता ०४.४२ ०५ .०३ १२ मिनिटे – देशात सर्वात कमी वेळ
वाराणसी ०४ .४१ ०५ .२२ ४१ –
रायपुर ०४ .५१ ०५.५३ ४१ –
भोपाल ०४.४२ ०५.४६ ०१.०५ तास
दिल्ली ४.२९ ०५.४२ ०१.१३ –
राजकोट ०४ .३८ ०६.१४ ०१.३६ –
भूज ०४.३४ ०६.१७ ०१.४३ – देशात सर्वाधिक काळ
जम्मू ०४.१७ ०५.४६ ०१.२९ –
श्रीनगर ०४.१५ ०५.४४ ०१.२९ –
बंगलोर ०५.१२ ०५.५५ ४४ मिनिटे
कन्याकुमारी ०५.३२ ०६.०० २८ मी
चेन्नई ०५.१४ ०५.४४ ३१ मी

विदर्भ – महाराष्ट्र

गडचिरोली ०४.५२ ०५.३९ ४७ मी
भंडारा ०४.४९ ०५.३९ ५० मी
गोंदिया ०४.४९ ०५.३७ ४८ मी
चंद्रपूर ०४.५२ ०५.४२ ५० मी
नागपूर ०४.४९ ०५.४२ ५३ मी
वर्धा ०४.४९ ०५.४४ ५५ मी
यवतमाळ ०४.५० ०५.४६ ५६ मी
अमरावती ०४.४८ ०५.४४ ५८ मी
अकोला ०४.४८ ०५.५० ०१.०२ तास
वाशीम ०४.५० ०५.५१ ०१.०१
बुलढाणा ०४.४८ ०५.५४ ०१.०६

 

जळगाव ०४.४६ ०५.५६ ०१.१० – तास
परभणी ०४.५१ ०५.५३ ०१.०१
पुणे ०४.५१ ०६.०५ ०१ १४
बीड ०४.५२ ०५.५७ ०१.०५
नंदुरबार ०४.४४ ०६.०१ ०१.१७
नाशिक ०४.४७ ०६.०४ ०१.१७
सोलापूर ०४.५४ ०६.०६ ०१.१२
कोल्हापूर ०४.५७ ०६.०५ ०१.०९
रत्नागिरी ०४.५५ ०६.०९ ०१.१४
औरंगाबाद ०४.५० ०५.५९ ०१.०९
मुंबई ०४.४९ ०६.०९ ०१.२०
पालघर ०४.४७ ०६.०८ ०१.२१

 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.