GST मुळे पीठ, तांदूळ, डाळ किती महागले? जाणून घ्या

96

केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर लावल्यानंतर, अन्नपदार्थांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. रोज लागणारे पीठ, डाळ, तांदूळ आणि साखर यांच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली आहे. यामुळे सामान्य नागिरकांचा खिसा दिवसेंदिवस रिकामा होत आहे.

व्यापा-यांच्या म्हणण्यानुसार, सध्या सुरु असलेल्या पावसामुळे डाळ, साखर, तांदुळ यांच्या किमतींत वाढ होते. मात्र, आता जीएसटी लावल्याने आणि त्यानंतर मूळ किमतीत वाढ केल्याने, वस्तूंच्या किमतींत वाढ झाली आहे. 18 जुलैनंतर, जीएसटीचा बोझा वाढल्यानंतर, दुग्ध उत्पादनांच्या किमतींत वाढ झाली आहे. पिठाच्या किमतीत जीएसटी वगळून प्रति किलो दोन रुपयांची वाढ झाली आहे. याचवेळी तांदूळ पाच ते 15 रुपयांनी महागले असून, डाळींच्या किंमतीत 20 रुपयांची वाढ झाली आहे.

( हेही वाचा:मरोळच्या मार्गावर होणार मेट्रो ट्रेन पार्क )

कंपन्यांनीही दिला दणका

जेव्हा कोणतीही कंपनी महाग कच्चा माल खरेदी करते, तेव्हा त्याचा थेट परिणाम किमतीवर पडतो. जुलैमध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर, किमती वाढल्या आहेत. आता डाळ, साखर, तांदूळ महाग होत आहेत. काही कंपन्यांनी मूळ किंमत वाढवली असल्याने, किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.