रेशनकार्ड धारकांसाठी E-KYC अनिवार्य; ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

712
रेशनकार्ड धारकांसाठी E-KYC अनिवार्य; 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

राज्य सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीतील सर्व रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ई-केवायसी न केल्यास शिधा वितरण बंद होण्याची शक्यता आहे. याआधी अंतिम मुदत २८ फेब्रुवारी होती. मात्र, नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन ३० मार्चपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांना रेशन दुकानातील ई-पॉस मशिनवर अंगठा स्कॅन करावा लागत होता. मात्र, सर्व्हर डाऊन होण्याच्या तक्रारी आणि अनेक शिधापत्रिकाधारक बाहेरगावी असल्याने अडचणी येत होत्या. या समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने “Mera e-KYC Mobile App” आणि “Aadhar Face RD Service App” हे मोबाईल अॅप्स सुरू केले आहे.

(हेही वाचा – मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना ग्रामसभेचा विरोध; गटविकास अधिकाऱ्याने निर्णयाला स्थगिती देताच Nitesh Rane यांनी सुनावले खडेबोल)

ई-केवायसी (E-KYC) करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे. Google Play Store वरून “Mera e-KYC Mobile App” आणि “Aadhar Face RD Service App” डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे.

Mera e-KYC Mobile App उघडून राज्य आणि ठिकाण निवडावे. आधार क्रमांक टाकून आलेला OTP संबंधित रकान्यात भरावा. सर्व माहिती भरून सबमिट बटणावर क्लिक करावे. Face e-KYC पर्यायावर क्लिक करून सेल्फी कॅमेरा सुरू करावा. डोळ्यांची उघडझाप करून फोटो काढावा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर “e-KYC पूर्ण” झाल्याचा संदेश मिळेल.

जिल्हा प्रशासनाने सर्व रेशनकार्ड धारकांनी ३० मार्चपूर्वी ई-केवायसी (E-KYC) करून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मोबाईल अॅपच्या माध्यमातून घरी बसूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी कळविले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.