बिहारच्या अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

115

बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज, रविवारी सकाळी 7.58 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 इतकी मोजण्यात आली. भूकंपाचे केंद्र नेपाळची राजधीनी असलेल्या काठमंडूच्या आग्नेय-पूर्वेस 147 किमी होते.

( हेही वाचा : Sanjay Raut ED Raid : काय आहे पत्राचाळ घोटाळा? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण )

अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

बिहार हे नेपाळच्या सीमेला लागून असलेले राज्य आहे. त्यामुळे नेपाळमधील भूकंपामुळे बिहारच्या काही जिल्ह्यांमध्येही त्याचे धक्के जाणवले आहेत. राजधानी पाटणा, सहरसा, पूर्णिया, मधेपुरा, कटिहार, अररिया, दरभंगा, मधुबनी, सीतामढी आणि मोतिहारीसह अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मात्र, अद्याप जीवितहानी किंवा कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही. या भूकंपाची तीव्रता कमी असली तरी त्यामुळे किरकोळ हादरे बसल्याने बहुतांश लोकांना त्याची जाणीव झाली नाही. कटिहारमध्येही लोकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. सकाळपासूनच राज्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे. यापूर्वी शनिवारी रात्री अनेक भागात पाऊस पडला आहे. त्यापार्श्वभूमीवर जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.