पालकांमधील असंतोषावर शिक्षणमंत्र्यांनी दिले ‘हे’ उत्तर!

136

शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने प्रवेश मिळत नाही वा त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. तसेच, अशा विद्यार्थ्यांचे नाव हजेरी पटावरुन कमी केले जाते. अशा घटना घडत असल्याचे सांगत, राज्यातील पालकांनी असंतोष व्यक्त केला. त्यांच्या या असंतोषावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत उत्तर दिले आहे.

गायकवाड यांचे स्पष्टीकरण

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये जर  विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसेल, तर त्यांची नावे शाळेच्या हजेरी पटावरुन कमी करण्यात येत नाहीत किंवा त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात नाही. आधारकार्ड नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत सांगितले.

( हेही वाचा :दारुच्या शुल्कात घट, इंधनाच्या नाही; या मंत्र्याने सरकारला लगावला अप्रत्यक्ष टोला ! )

म्हणून शैक्षणिक नुकसान नाहीच

विधानपरिषद सदस्य ॲड.निरंजन डावखरे यांनी नियम 93 अन्वये राज्यात शाळेतील विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसलेल्यांची नावे शाळेच्या पटावरुन कमी करण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली असल्याचे निदर्शनात येणे, त्यामुळे पालकांमध्ये निर्माण झालेला असंतोष याबाबत नियम 93 अन्वये सूचना मांडली होती. त्यावर शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत निवेदन केले. पोर्टलवार नोंद करताना, विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक विचारला जातो, तो फक्त डेटा उपलब्ध असावा म्हणून असतो, परंतु विद्यार्थ्यांना सक्ती केली जात नाही किंवा त्यांना वर्गाबाहेर किंवा हजेरी पटावरील नाव कमी केले जात नाही. आधारकार्ड नाही म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जाणार नाही असेही वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.