कोकण रेल्वे सुसाट! १ मे पासून ‘या’ गाड्या धावणार विद्युतवेगाने…

155

कोकण रेल्वे म्हणजे मुंबईकर चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा विषय! याच कोकण रेल्वेने १०० टक्के विद्युतीकरण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोकण रेल्वेचे कौतुक करत अभिनंदन केले होते. आता मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मे पासून पहिल्या टप्यात दहा गाड्या विजेच्या इंजिनाने चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कोकणवासीयांचा प्रवास प्रदुषणमुक्त आणि वेगवान होईलच तसेच कोकणचे नैसर्गिक सौंदर्य सुद्धा अबाधित राहण्यास मदत होईल.

( हेही वाचा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा कधी मिळणार तिसरा हफ्ता? )

प्रवाशांच्या वेळेची बचत होणार

संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर ६ ते ७ वर्षांपासून विद्युतीकरणाचे काम सुरू होते. गेल्या काही महिन्यात मडगाव-कारवार आणि मडगाव -थिवीम या मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले होते. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी याबद्दलची तपासणी केली होती. त्याच्या आधी कारवार-ठोकूर आणि रोहा-रत्नागिरी या टप्प्यांचे विद्युतीकरण झाले होते. मुंबई ते रत्नागिरी असे कोकण रेल्वेचे विद्युतीकरण झाल्यामुळे मालगाड्या आणि दिवा-रत्नागिरी पॅसेंजर विद्युत इंजिनावर चालवली जाते. विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेची गती वाढून प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.

१ मे पासून या गाड्या विजेवर धावणार

  • मांडवी
  • जनशताब्दी
  • कोकणकन्या
  • मस्त्यगंधा
  • नेत्रावती
  • मंगला एक्सप्रेस
  • मडगाव पॅसेंजर
  • मंगळूर-सीएसएमटी एक्स्प्रेस
  • दोन राजधानी एक्सप्रेस

डिझेलवर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या विजेवर सुरू केल्यानंतर तब्बल १५० कोटींची बचत करणे शक्य होणार आहे असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.