मुंबईत (Mumbai) सध्या जलाशयांमध्ये केवळ ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर काही भागांत पाणीकपात सुरू आहे, आणि नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत टँकरचालकांनी नवीन नियमांच्या विरोधात पुकारलेल्या संपामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या संपाचा फटका झोपडपट्ट्या, मॉल्स, हॉटेल्स, रुग्णालये, मेट्रो आणि इमारत बांधकामांना बसत आहे. विशेषतः गैरपेयजलाची गरज असलेल्या प्रकल्पांना याचा मोठा त्रास होत आहे.
(हेही वाचा – जर ईडीला मूलभूत अधिकार असतील तर त्यांनी लोकांच्या हक्कांचाही विचार करावा ; Supreme Court पुन्हा ने फटकारले)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना टँकरचालकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या आणि नियमांमधील त्रुटींवर तोडगा काढण्याचे निर्देश दिले. “उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईमुळे नागरिकांचा त्रास वाढता कामा नये. टँकरचालकांच्या मागण्यांचा विचार करत सामान्य जनतेला त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या संपामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्याच्या (Water shortage) समस्येवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. शहराला दररोज ४,२०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना, महापालिका केवळ ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करू शकते. यामुळे टँकर हा अनेक भागांसाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. या समस्येचे मूळ शोधून दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात अशी संकटे टाळता येतील. सध्या तरी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशांनुसार महापालिका आणि टँकरचालक यांच्यातील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –