चालू हंगामातील पहिला आंबा पोहोचला मुंबईत…

110

चालू हंगामातील पहिला आंबा रायगड जिल्ह्याच्या अलिबागमधून मुंबई बाजारात आला आहे. अलिबाग तालुक्यातील नारंगी येथील बागायतदार एस.के. मँगोजचे मालक वरुण पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी प्रत्येकी दोन डझनाच्या पाच पेट्या आंबा मुंबई बाजारात पाठवला.

प्रतिकूल हवामानानंतरही आंब्याची काढणी

रायगडसह कोकण पट्ट्यात अवकाळी पाऊस, खराब हवामान आदी कारणांमुळे अनेक फळ, पिकांचे नुकसान झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वरुण पाटील यांनी यशस्वीरित्या आंब्याची काढणी केली. हा आंबा त्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी बाजारात पाठवला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी वरुण यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.

(हेही वाचा १०वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीत सुवर्ण संधी! २,७८८ रिक्त…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.