राज्यात 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीस बंदी!

पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांवर तसेच बिगर यांत्रिकी नौकांना ही बंदी लागू राहणार नाही.

66

माशांचे प्रजोत्पादन व्हावे तसेच पावसाळ्यात मच्छिमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी 1 जून ते 31 जुलै 2021 या कालावधीत राज्याच्या समुद्र आणि खाडी येथे यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली असल्याचा आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने काढला आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.  

पारंपरिक मासेमारी, बिगर यांत्रिकी नौकांवर बंदी नाही!

जून व जुलै महिन्यात मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारीस बंदी घातल्यामुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच या कालावधीत वादळी हवामानामुळे मच्छिमारांची जिवीत व वित्त हानी होऊ नये यासाठीही ही बंदी घालण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
यासंबंधी मत्स्य व्यवसाय विभागाने काढलेल्या आदेशात नुसार, 1 जून 2021 ते 31 जुलै 2021 या कालावधीत राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही.

(हेही वाचा : कशी होते मान्सून वा-यांची निर्मिती? भारत आणि महाराष्ट्रात कसा पडतो प्रभाव?)

…तर बोट जप्त होईल!

राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास/केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981  कलम 14 अन्वये नुसार बोट जप्त करण्यात येऊन त्यात पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल, तसेच कलम 17 मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्यात येईल, असे या आदेशात नमूद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.