सरकारी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा धक्का! ‘हा’ दिला निर्णय

140

शासकीय नोकरी मिळावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेकजण दिवसरात्र अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवतात. परंतु आता शासकीय कर्मचाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाने नवा नियम जाहीर केला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत वैयक्तिक कामासाठी मोबाईल वापरण्याची परवानगी देऊ नये असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला दिले आहेत. तसेच याबाबत राज्य सरकारला नियम बनवण्याची सूचना केली आहे. असा निर्णय देत न्यायालयाने शासकीय कर्मचाऱ्यांना धक्का दिला आहे.

मोबाइल फोन वापरण्याची परवानगी देऊ नये

न्यायमूर्ती एस.एम. सुब्रमण्यम यांनी तामिळनाडू सरकारला सांगितले की, राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत वैयक्तिक वापरासाठी मोबाइल फोन वापरण्याची परवानगी देऊ नये आणि या संदर्भात नवीन नियम बनवून आदेश द्या, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यानुसार  वैयक्तिक कामासाठी मोबाईल वापरण्याची परवानगी देऊ नये असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला दिले आहेत.

( हेही वाचा : आरबीआयने ठोठावला 8 सहकारी बँकांना दंड! महाराष्ट्रातील कोणत्या आहेत बँका? )

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारनेही याबाबत एक आदेश जारी केला होता. देशातील पेगॅसस स्पायवेअर प्रकरणावरुन जोरदार चर्चेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत मोबाईल फोनचा वापर कमी करण्यास सांगितले होते. कार्यालयीन वेळात मोबाइल फोनचा अंदाधुंद वापर केल्याने सरकारची प्रतिमा धुळीस मिळते, असे या आदेशात म्हटले होते. राज्य शासकीय अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी अधिकृत कामांसाठी आवश्यक असल्यास मोबाइल फोनचा वापर करावा असे या आदेशात नमूद करण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.