H3N2 विषाणू पसरतोय, सर्दी, खोकला वाढलाय; काय काळजी घ्याल? 

171

‘खोकला सुरू होऊन तीन आठवडे झाले पण खोकला थांबतच नाही, अशी तक्रार मोठ्या प्रमाणात येत आहे. आपल्या आजुबाजुला खोकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, कारण देशभरात फ्ल्यू रुग्णांची संख्या वाढल्याचे निदर्शनास येत आहे. या फ्लूमध्ये H3N2 हा व्हायरस असल्याचेही दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने एक पत्रक जारी केले आहे. व्हायरल फ्लूची लागण झाली असल्यास अँटिबायोटिक्स घेऊ नका असेही आवाहन IMA कडून करण्यात आले आहे.

व्हायरसचा धोका किती आणि अँटिबायोटिक्स का वापरू नये?

व्हायरल इनफेक्शन सामान्य असले आणि दरवर्षी फेब्रुवारीमध्ये रुग्ण दिसत असले तरी या व्हायरसचे आता म्युटेशन झाले आहे. H3N2 व्हायरसमध्ये खोकला कमीतकमी तीन आठवड्यांपर्यंत राहतो. यामुळे रुग्ण हैराण होत आहेत. खोकला जात नाही म्हणून अँटिबायोटिक्स औषध घेतात. हे हानिकारक आहे असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे म्हणणे आहे. बऱ्याच वेळेला स्वत:हून अँटिबायोटिक्स घेतात. व्हायरल इनफेक्शनमध्ये अँटिबायोटिक्स घेत नाही. याला सिम्प्टमेटिक उपचार द्यायचे असते. व्हायरल फिव्हर म्हणजे ताप आल्यास त्यासाठीही अँटिबायोटिक्स तुम्ही घेतले तर इतर आजारांसाठी अँटिबायोटिक्स काम करणार नाही, कारण बॅक्टेरियाला त्याची सवय होते, त्याचा रेझिझटन्स वाढतो.

लक्षणे काय आहेत?

ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, अशक्तपणा, डायरिया सुरू होणे ही साधारण लक्षणे या व्हायरसची आहेत. यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यायला हवा. डॉक्टरही अँटिबायोटिक्स देतात का हे सुद्धा तपासायला हवे. आता केवळ सर्दी, खोकला असेल तर सुरुवातीचे दोन ते तीन दिवस तुम्ही थांबू शकता. परंतु ताप आल्यास तुम्ही तो अंगावर काढू नये. तसेच डायरिया किंवा वीकनेस असल्यास तुम्ही नक्की डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. सगळीकडेच प्रदुषण वाढले आहे. बांधकाम, रस्त्यांची कामे सुरू असलेली दिसतात. यामुळे सुद्धा श्वसन यंत्रणेला अधिक त्रास जाणवतो.

काय काळजी घ्याल?

पुरेसे पाणी प्या  – डॉक्टरांकडे गेला नाहीत तरी तुम्ही पुरेसे पाणी प्याल याची काळजी घ्या. दिवसभरात तीन लीटर पाणी शरीरात जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे पुरेसं पाणी तुमच्याजवळ असेल अशी खबरदारी घ्या.

गर्दीत जाणे टाळा – कोरोना आरोग्य संकटात आपण ही गोष्ट शिकलो आहे की संसर्ग असेल तेव्हा गर्दी टाळणे हे किती महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरते. आताही अनावश्यक असल्यास गर्दीत जाणे टाळा. खोकला वाढला असल्यास कार्यालयातही दोन ते तीन दिवस जाऊ नका. यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही. व्हायरल फ्ल्यू असल्यास काही दिवस घरी आराम करू शकत असाल तर उत्तम. यामुळे तुम्हीही लवकर बरे व्हाल आणि प्रसारही थांबू शकेल.

मास्क वापरा – कोरोना काळात आपण सगळ्यांनी मास्क वापरला आहे. मास्कमुळे आपणही सुरक्षित राहतो. त्यामुळे गर्दीत जाताना मास्क नक्की वापरा असे डॉक्टर आवर्जून सांगतात. हल्ली कपड्यांना मॅचिंग म्हणून सुद्धा कापडी मास्क वापरला जातो. परंतु सर्जिकल मास्क वापरणे अधिक योग्य ठरेल. सर्जिकल मास्क अधिक उपयुक्त आहे.

आहार – डॉक्टरांनुसार, तुम्ही पौष्टिक आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे. याचे कारण म्हणजे योग्य आहारामुळे शरीरात प्रतिकार शक्ती वाढू शकते. शरीराची इम्युनिटी किंवा प्रतिकार शक्तीच व्हायरसविरोधात लढत असते. प्रतिकार शक्ती चांगली असल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. यामुळे आहाराकडे लक्ष द्या.

(हेही वाचा उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर बोलत होते, तेवढ्यात अजित पवारांनी मारला डोळा! पहा व्हायरल व्हिडिओ)

हायड्रेशन आणि व्यायाम महत्त्वाचा 

हा व्हायरस ड्रॉपलेट इनफेक्शनमुळे एकमेकांमध्ये वेगाने पसरतो. आता सुदैवाने हा व्हायरस जीवघेणा नाही. परंतु हा व्हायरस वेगाने पसरतो आहे हे निश्चित

लहान मुले आणि वृद्धांनी काय काळजी घ्यायला हवी?  

लहान मुलांना तुम्ही सतत घरी ठेऊ शकत नाही. त्यांना खेळायला जायचे असते. आता तर उन्हाळ्याची सुटी सुरू होईल. पण जर त्यांना खोकला, सर्दी किंवा ताप असेल तर काही दिवस तरी त्यांना घराबाहेर पाठऊ नका. तसेच डायरिया झाला असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. शिवाय, त्यांना खूप पाणी द्या. पाण्याची बाटली त्यांना द्या किंवा ते दिवसभरात किती पाणी पीत आहेत याकडे लक्ष ठेवा. त्यांच्या आहाराची काळजी घ्या. त्यांच्या शरीरात प्रतिकार क्षमता वाढले असा आहार त्यांना द्या. डायरिया मुलांमध्ये सामान्य आहे. लगेच मुलांना डायरिया होतो. त्यामुळे डायरिया सुरू झाल्यास त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा. कोमॉर्बीडीटीज हा शब्द आपण कोरोना काळात ऐकला आहे. आता ज्यांना कोमॉर्बीडीटी आहे त्यांनी अधिक काळजी घेणं गरजेचे आहे. त्यांच्या शरीरात व्हायरसचा इफेक्ट लवकर होतोना दिसतो. त्यामुळे त्यांनी दोन-तीन दिवसही उपचारासाठी थांबू नये तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

IMA ने काय म्हटले आहे?

देशात काही दिवसांत फ्लूसदृश रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजारामध्ये खोकला, मळमळ, उलट्या, घसा दुखणे, ताप, अंगुखी आणि डायरिया यांच्यासारखी लक्षणे आढळून येत आहेत, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. नागरिकांनी वरील लक्षणे आढळली तरी घाबरून न जाता काळजी घ्यावी. या आजारामध्ये खोकला, मळमळ, उलट्या, घसा दुखणे, ताप, अंगुखी आणि डायरिया यांच्यासारखी लक्षणे आढळून येत आहेत, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली. नागरिकांनी वरील लक्षणे आढळली तरी घाबरून न जाता काळजी घ्यावी. IMA च्या पत्रकानुसार, ही लक्षणे पाच ते सात दिवस दिसू शकतात. ताप असल्यास तो तीन दिवसात बरा होतो. पण खोकला तीन आठवड्यांपर्यंत राहू शकतो. NCDC च्या माहितीनुसार यातील बहुतांश प्रकरणे ही ‘H3N2’ या विषाणूमुळे होत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.