मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरु!

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरासह ठाणे, पालघर जिल्ह्याला पुढील चार तासांत मुसळधार पावसाचा तडाखा बसणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

87
 मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सर्वत्र पावसाचे ढग दाटून आले आहे, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. तसेच पुढील ४ तासात आणखी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे रस्त्यांवर पावसाचे पाणी साचू लागले आहे, मात्र लोकल रेल्वेवर अद्याप परिणाम झाला नाही, अशी माहिती आहे.

लोकल सेवा सुरळीत!

बरीच दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने दहीहंडीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात कम बॅक केले आहे. सोमवारी, रात्री उशिरापासूनच राज्यात पावसाने जोरदार बॅटिंगला सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना सकाळीच मुसळधार पाऊस पाहिल्यावर नोकरदारांना मात्र चिंता वाढली आहे. सकाळीच कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नोकरदारांना लोकल सुरु आहेत का, रस्ते वाहतूक सुरु आहे का, अशी धाकधूक सुरु झाली. मात्र सकाळपर्यंत तरी लोकल सेवा सुरळीत होती. दरम्यान मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरासह ठाणे, पालघर जिल्ह्याला पुढील चार तासांत मुसळधार पावसाचा तडाखा बसणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

औरंगाबाद, जळगाव येथे पूरस्थिती 

दरम्यानच्या औरंगाबाद आणि जळगाव येथे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद येथे इतका पाऊस पडला आहे कि यामंजू येथील गावांचा संपर्क तुटला आहे. तर जळगाव येथे मात्र नद्या दुथड्या भरल्या आहेत. तसेच धरणेही भरले आहेत. त्यामुळे येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुकाने, घरांमध्ये पाणी घुसले आहे. गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच पिकांचे नुकसानही झाले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.