राज्यात पुन्हा मुसळधार… या जिल्ह्यांना अलर्ट जारी

हवामान विभागानं काही जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट जारी केला आहे.

110

राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा जोरदार पुनरागमन करणार आहे. राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांमध्ये कोसळणार

21 सप्टेंबरला पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, मुंबईत काही ठिकाणी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. तर, हवामान विभागानं काही जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट जारी केला आहे.

नागरिकांना आवाहन

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस म्हणजेच 23 सप्टेंबरपर्यंत राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

21 सप्टेंबर- पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, जालना, बीड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, गोंदिया (यलो अलर्ट)

22 सप्टेंबर- पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली (यलो अलर्ट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.