हिंदु देवतांची टिंगल करणार्‍या वीर दासचा ‘आवाज’ मुंबईतही होणार बंद

132

सध्या स्टॅन्ड अप कॉमेडीच्या नावाखाली हिंदू देवता, राष्ट्रपुरुषांच्या अवमान करण्याचे प्रकार सर्रास वाढत आहेत. यापूर्वी ‘स्टॅण्ड अप कॉमेडीयन’ मुनव्वर फारूकी होता, आता वीर दास आला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तुम्हाला गैरवापरच करायचा असेल, तर तुम्ही मुसलमानांचे प्रेषित किंवा ख्रिस्त्यांच्या देवदूत यांच्याविषयी ‘कॉमेडी’ करून दाखवावी ! ‘सर तन से जुदा’च्या भीतीमुळे आज कोणी असे करू धजावणार नाही; मात्र हिंदु सहिष्णू असल्याने हिंदू देवतांचे विडंबन केले जाते, मात्र आता याला हिंदू विरोध करू लागले आहेत, त्यांमुळेच मुनव्वर फारुकी याचे जिथे जिथे कार्यक्रम आयोजित केले जातात तिथे त्याला विरोध होऊन कार्यक्रम रद्द होऊ लागले आहेत, आता असाच स्टॅन्ड अप कॉमेडीन वीर दास यानेही हिंदू देवतांचे विडंबन केल्यामुळे त्याच्याही कार्यक्रमाला विरोध होऊ लागला आहे. दिल्ली, गोवा कर्नाटकानंतर आता मुंबईतही त्याच्या कार्यक्रमाला विरोध झाल्यामुळे त्यांचा मुंबईतही ‘आवाज बंद’ होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांची पोलिसांत तक्रार, केली अटकेची मागणी)

वीर दास याचा २४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील षन्मुखानंद सरस्वती येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्याला हिंदू जनजागृती समितीने विरोध करत, ‘आम्ही आमच्या देवतांचा अपमान सहन करणार नाही. पोलिसांनी आणि आयोजकांनी जर हा कार्यक्रम रहित केला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि हा कार्यक्रम होऊ देणार नाही. हिंदुस्थानात रहायचे असेल, तर हिंदूंच्या देवतांचा आदर राखायलाच हवा’, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीने घेतली.  याच वीर दासचा गेल्या आठवड्यात बंगळुरु येथील कार्यक्रम हिंदु जनजागृती समितीच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला होता. आता तोच कार्यक्रम मुंबईत होत आहे. या ‘कॉमेडी शो’ला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. 24 नोव्हेंबर या दिवशी शीव (सायन) येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेला ‘कॉमेडी शो’ रहित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच मुंबई पोलीस आयुक्त आणि शीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार देखील केली आहे.

(हेही वाचा लव्ह जिहाद : आफताबने हत्या केलेली हिंदू युवती होती गर्भवती?)

वीर दास यांनी काय केलेली विधाने? 

वीर दास याने यापूर्वी त्याच्या ‘कॉमेडी शो’ मध्ये भारतीय स्त्रिया, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत यांविषयी अपमानास्पद विधाने केली आहेत. ‘सीता आणि लक्ष्मण चौदा वर्षे एकत्र जंगलात राहिले आणि ही वस्तुस्थिती आहे’, ‘लक्ष्मण जंगलात असताना 14 वर्षे झोपला नाही. तुम्ही कल्पना तरी करू शकता का, की तेव्हा सीता किती घाबरली असेल’, ‘हिंदू लोक गायीची लघवी पितात, कारण त्यांचे असे मत असते की, या लघवीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की, ते काय स्वतःला लघवीचे तज्ञ समजतात का ?’ या आणि अशा प्रकारच्या अत्यंत अश्लाघ्य भाषेत हिंदु धर्म, देवता आणि संस्कृती यांची टिंगल वीर दासने केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.