राज्यात शनिवारी ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

135

राज्यात आठवड्याच्या शेवटी वरुणराजा पुन्हा हजेरी लावणार आहे. शनिवार आणि रविवार वरुणराजाची कृपादृष्टी राज्यातील मोजक्याच जिल्ह्यांत दिसून येईल. पालघर, नाशिक, पुणे तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियात मुसळधार पाऊस येणार असल्याने मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईत व नजीकच्या परिसरात मात्र मंगळवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता नसल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

रविवारी केवळ मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट

शनिवारी पालघरसह नाशिक आणि पुण्यातील केवळ घाट परिसरात मुसळधार पाऊस राहील. रविवारी केवळ पालघर आणि नाशिक येथे मुसळधार पावसाला मारा कायम राहील. पुण्यात रविवारपासून पावसाचा जोर कमी आढळून येईल. हिंगोली आणि नांदेडमध्ये शनिवारी पावसाची शक्यता नाही. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वा-यांचा वेग ३० ते ४० किलोमीटरपर्यंत दिसेल. विदर्भात केवळ शनिवारीही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी केवळ मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट दिसून येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.