मालकांनो! … तर अपघाताची जबाबदारी तुमचीच

106

अपघात झाला, तर जबाबदारी मालकाचीच असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. विनापरवाना वाहन चालवताना अपघात झाल्यास मूळ मालकाकडून विमा कंपनी नुकसान भरपाई घेऊ शकते, असे उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

रक्कम वसूल करण्याचे आदेश

दोन वर्षांपूर्वी कराड मोटार अपघात दावा न्यायधिकरणाने एका अपघातासंदर्भात निकाल दिला होता. त्याविरोधात विमा कंपनीने उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. अपघात झाला तेव्हा ट्रक चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता. ही बाब मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाने ग्राह्य धरली नाही. अपघात करणा-या चालकाच्या वाहन परवान्याचे नूतनीकरण झाले नव्हते. अपघातानंतर त्याने परवान्याचे नूतनीकरण केले. त्यामुळे वाहन मालकाकडून भरपाईची रक्कम वसूल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अपघात दावा न्यायाधिकरणाकडे केली. ती न्यायाधिकरणाने मान्य केली नाही.

( हेही वाचा :“नागपूरच्या फे-या वाढवणार”, या विधानामागे राऊतांंनी दिला इशारा! )

न्यायालयाचा निर्देश

उच्च न्यायालयाने ही भरपाई वसूल करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी विमा कंपनीने केली. न्यायमूर्ती वीरेंद्रसिंग ग्यानसिंग बिष्ट यांच्यासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. वाहन मालकाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केली आहे. या प्रकरणात विमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी आणि मालकाकडून ती वसूल करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.