१२ ते १४ वयोगटातील मुलांचे ‘या’ जिल्ह्यांमध्ये शून्य लसीकरण!

169

देशभरात १२ ते १४ वयोगटातील लहान मुलांचे लसीकरण १६ मार्चपासून सुरू झालेले आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करत माहिती दिली होती. राज्यात अवघ्या तीन दिवसांमध्ये १२ ते १४ वयोगटातील सुमारे ४४ हजार ८७० बालकांना लस देण्यात आली आहे. सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लसीकरण झाले आहे. तर, मुंबई, ठाणे, पुणे या प्रमुख शहरांमध्ये या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. परंतु राज्यात असे काही जिल्हे आहेत ज्याठिकाणी १२ ते १४ वयोगटातील एकाही बालकाचे लसीकरण झालेले नाही.

( हेही वाचा : राज्यात उन्हाचा तडाखा पण, ‘या’ भागात पावसाचा इशारा )

या जिल्ह्यांमध्ये शून्य लसीकरण

कोविन अॅपच्या आकडेवारीनुसार गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, सोलापूर, वर्धा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी याठिकाणी १२ ते १४ वयोगटातील एकाही बालकाचे लसीकरण झालेले नाही. तर, मुंबई, ठाणे, पुणे, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मुलांच्या लसीकरणाला तुलनेने अल्प प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, राज्यात शुक्रवारी कोरोनाचे १७१  नवे रुग्ण  आढळले आहेत, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शुक्रवारी ३९४ रुग्ण बरे झाले असून  सध्या १ हजार ६८० रुग्ण उपचाराधीन आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.