तुम्ही तिकीट काढताय ना? मध्य रेल्वेने राबवलीय ‘ही’ मोहिम!

126

मध्य रेल्वेने अनियमित आणि विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांविरोधात तिकीट तपासणीची तीव्र मोहिम राबवली आहे. त्यामुळे जर तुम्ही मध्य रेल्वेने प्रवास करणार असाल, तर विनातिकीट प्रवास करणं टाळा, नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. मध्य रेल्वेने राबवलेल्या या तीव्र मोहिमेअंतर्गत आतापर्यंत मध्य रेल्वेने आपल्या तिजोरीत 200 कोटींचा महसूल जमा केला आहे.

कोरोना काळातही मध्य रेल्वेची कमाई

1 एप्रिल 2021 ते 16 मार्च 2022 दरम्यान एकूण 33 वा 30 लाख विनातिकीट प्रकरणे आढळून आली. त्यातून मध्य रेल्वेला 200.85 कोटींचा महसूल मिळाला आहे. भारतीय रेल्वेच्या सर्व  विभागामधील ही सर्वाधिक प्रकरणे आणि महसूल आहे. कोरोना निर्बंधांच्या काळातही सर्वाधिक कमाई करण्यात आल्याचे, मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

( हेही वाचा: केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करुन मोठी चूक केली, सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल! )

सर्वाधिक मुंबईतून दंडवसूली

मुंबई विभागातर्फे विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची एकूण 12.93 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यातून 66.84 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. सर्वाधिक दंड वसूली ही मुंबई विभागाकडून करण्यात आली. भुसावळ विभागात विनातिकीट प्रवाशांची एकूण 8.15 लाख प्रकरणे आढळून आली. त्यातून 58.75 कोटी रुपये, नागपूर विभागात 5.03 लाख प्रकरणांतून 33.32 कोटी, सोलापूर विभागात 3.36 लाख प्रकरणांतून 19.42 कोटी आणि पुणे विभागात 2.05 लाख प्रकरणांतून 10.05 कोटी रुपये दंडवसुली झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.