Lok Sabha Election : चौथ्या टप्प्यात देशात सरासरी ६२.८४ टक्के; महाराष्ट्रात ५२.७५ टक्के मतदान

223
Minority Votes : अल्पसंख्यांक मतांसाठी महायुती सरकारकडून ‘मार्टी’ ची स्थापना

लोकशाहीचा सर्वांत मोठी उत्सव म्हटल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभेच्या निवडणुकातील (Lok Sabha Election) चौथ्या टप्प्याचे मतदान  सोमवारी पार पडले. यात देशभरात १० राज्यांतील ९६ आणि राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. यामध्ये दिवस अखेर रात्री ८ वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार देशात सरासरी ६२.८४ टक्के, तर महाराष्ट्रात ५२.७५ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश २५ मतदारसंघात ६८.१२ टक्के, बिहार ५ मतदारसंघात ५५.९० टक्के, जम्मू-काश्मीर १ मतदारसंघात ३६.५८ टक्के, झारखंड ४ मतदारसंघात ६३.३७ टक्के, मध्य प्रदेश ८ मतदारसंघात ६८.६३ टक्के, महाराष्ट्र ११ मतदारसंघात ५२.७५ टक्के, ओडिशा ४ मतदारसंघात ६३.८५ टक्के, तेलंगाणा १७ मतदारसंघात ६१.३९ टक्के, उत्तर प्रदेश १३ मतदारसंघात ५७.८८ टक्के, पश्चिम बंगाल ८ मतदारसंघात ७५.९४ टक्के मतदान झाले आहे. (Lok Sabha Election)

(हेही वाचा Ghatkopar Hoarding Accident : होर्डिंग दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट)

महाराष्ट्रात कुठे किती टक्के झाले मतदान? 

  • जळगाव – ५१.९८ टक्के
  • जालना – ५९.४४ टक्के
  • मावळ – ४६.०३ टक्के
  • नंदुरबार – ६०.६० टक्के
  • पुणे – ४४.९० टक्के
  • रावेर – ५६.१६ टक्के
  • शिर्डी – ५५.२७ टक्के
  • शिरुर – ४३.८९ टक्के
  • अहमदनगर – ५३.२७ टक्के
  • औरंगाबाद – ५४.०२ टक्के
  • बीड – ५०.३७ टक्के

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.