Love Jihad : ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय?

94
Love Jihad : ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय?
  • शेफाली वैद्य

एक धर्मांध मुसलमान रोटीला थुंकी लावून ती विकत असल्याचा किळसवाणा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. यापूर्वीही एका प्रसिद्ध हेअर स्टायलिस्टने थुंकी लावून केस सेट केल्याचेही सर्वांनी पाहिले आहे. या नजरचुकीने होणाऱ्या घटना नाहीत, तर हा जाणीवपूर्वक केला गेलेला जिहाद आहे. हा थूक जिहाद आहे. अशाच प्रकारे आपल्या जीवनातील अनेक क्षेत्रांत वेगवेगळ्या प्रकारच्या जिहादने शिरकाव केला आहे. वरकरणी त्याची धग जाणवली नाही, तरी त्याने होणारे नुकसान किती मोठे आहे, हे लव्ह जिहादमुळे (Love Jihad) शरिराचे तुकडे तुकडे झालेल्या श्रद्धा वालकर प्रकरणात समोर आलेच आहे. जिहादची ही दाहकता लक्षात घेऊन त्याविषयी जागृती करण्याचा हा प्रयत्न !

समाज माध्यमांचा एक खूप मोठा फायदा म्हणजे वाचक तुमच्याशी थेट संवाद साधू शकतात. मला बऱ्याच वेळेला ‘इनबॉक्स’मधून अगदी खासगी स्वरूपाचे मेसेजेस येतात. काल तसाच एक मेसेज आला. पाठवणारी मुलगी युपीची आहे, कॉलेजमध्ये शिकते. तिचा प्रश्न ’लव्ह जिहाद’बद्दल (Love Jihad) होता. तिचं म्हणणं होतं की घटनेने कुठल्याही सज्ञान भारतीय नागरिकाला स्वतःला हव्या त्या व्यक्तीशी विवाह करायचे अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक हिंदू-मुसलमान विवाह हा ’लव्ह जिहाद’ समजायचा का? मी तिला सांगितलं की, प्रत्येक आंतरधर्मीय विवाह हा अर्थातच ’लव्ह जिहाद’ असू शकत नाही, पण बिगरमुस्लीम मुलींना पद्धतशीरपणे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करणे म्हणजे ’लव्ह जिहाद’. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने देखील केरळमध्ये ’लव्ह जिहाद’ अस्तित्वात आहे, हा ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’चा (एनआयए) युक्तिवाद ग्राह्य धरूनच ‘एनआयए’ला चौकशीचा आदेश दिला आहे.

(हेही वाचा – Chembur Sexual Assault : मुंबईत शाळकरी विद्यार्थिनीचा रिक्षा चालकाकडून लैंगिक छळ)

हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ज्या प्रकरणात दिला ते प्रकरण म्हणजे शफीन जहाँ या मुसलमान तरुणाने अथिया या हिंदू मुलीशी केलेला तथाकथित विवाह आणि त्या विवाहानंतर त्या मुलीने केलेलं धर्मांतर. मुलीचे वडील अशोकन यांनी हे ‘लव्ह जिहाद’चं (Love Jihad) प्रकरण असल्याचा आरोप केला होता आणि त्या विवाहाविरुद्ध ते न्यायालयात गेले होते. सर्व साक्षी पुरावे पडताळून बघितल्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य करून शफिन जहाँ व अथिया यांचं लग्न रद्द करून अथियाचा ताबा तिच्या आई-वडिलांकडे दिला. शफिन जहाँ यांनी आपलं लग्न रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाचा निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या प्रकरणात ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ची बाजू मांडताना ही केवळ आंतरधर्मीय विवाहाची केस नसून हिंदू तरुणींना फूस लावून त्यांचे धर्मांतर घडवून आणण्याचा पद्धतशीर प्रयत्न केरळमध्ये होतोय आणि या धर्मांतराची पाळेमुळे थेट इस्लामी दहशतवादापर्यंत पोहोचतात,” असे प्रतिपादन ‘एनआयए’तर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केले होते. या आरोपाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने हा चौकशीचा आदेश दिला आहे.

खरेतर हे ’लव्ह जिहाद’ (Love Jihad) प्रकरण नवे नाहीच. २०१० मध्ये केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट नेते अच्युतानंदन यांनीही कडव्या इस्लामी संघटना ’मॅरेज अ‍ॅण्ड मनी’ म्हणजे ’लग्न आणि पैसा’ ही दोन शस्त्रे वापरून केरळचे इस्लामीकरण करत आहेत, असा गंभीर आरोप केला होता. केरळची चर्च आणि हिंदू संघटना यांनीही या आरोपाला पुष्टी दिली होती. काही दिवसांपूर्वी एका राष्ट्रीय न्यूज चॅनेलवरदेखील ’लव्ह जिहाद’ होतो आहे आणि त्यासाठी काही कडव्या मुस्लीम संघटनांनी रेट कार्डही काढले आहेत, असा खळबळजनक आरोप करण्यात आला होता. तथाकथित ’प्रागतिक’ विचारसरणीच्या लोकांचा यावरचा युक्तिवाद म्हणजे, प्रेम हे धर्मातीत असतं, त्यामुळे कुठल्याही हिंदू मुलीला मुसलमान मुलावर प्रेम करायचा आणि त्याचा धर्म स्वीकारायचा हक्क आहे. कायदेशीरदृष्ट्या हे बरोबरच आहे, पण असे विवाह करणाऱ्या मुली कुठल्या कुटुंबातून येतात, विवाह करताना त्यांची मानसिक स्थिती काय असते, त्या मुसलमान होणार म्हणजे नक्की काय करणार, त्या एका निर्णयामुळे त्यांच्या कायदेशीर हक्कांमध्ये काय फरक पडू शकतो याची पूर्ण जाणीव त्यांना असते का हे सगळं विचारात घेणं महत्त्वाचं आहे. मुद्दा दोन भिन्नधर्मीय लोकांनी प्रेमात पडण्याचा नाही किंवा लग्न करण्याचाही नाही. मुद्दा आहे तो लग्नाआधी धर्मांतर करण्याचा!

(हेही वाचा – Vasaicha Raja : ‘वसईचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या नैवेद्य स्पर्धा आणि सामूहिक अथर्वशीर्ष पठाणाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद)

भारतीय घटनेनुसार, दोन भिन्नधर्मीय व्यक्तींना आपापले धर्म न बदलता ‘स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट’खाली विवाह करता येतो. असा विवाह करणाऱ्या स्त्रीचा कुठलाही कायदेशीर हक्क हिरावून घेतला जात नाही. प्रसंगी पतीबरोबर न पटल्यास तिला न्यायालयात जाऊन घटस्फोट घेण्याचा, पोटगी मागण्याचा आणि नवऱ्याच्या मालमत्तेवर पत्नी म्हणून अधिकार सांगण्याचा हक्क आहे. पण, ज्या स्त्रिया लग्नापूर्वी धर्मांतर करून ‘शरिया’ कायद्याखाली निकाह करतात, त्यांना मात्र या सगळ्या अधिकारांवर पाणी सोडावं लागतं. मुसलमान पुरुषाला ‘शरिया’ कायद्यानुसार चार वेळा विवाह करायचा अधिकार आहे. त्याला पत्नीला आवाजी घटस्फोट घ्यायचाही अधिकार आहे, जो अधिकार स्त्रीला नाही. मुसलमान पुरुष स्त्रीला तीन वेळा ‘तलाक’ म्हणून घटस्फोट देऊ शकतो. पण स्त्रीला तो हक्क नाही. बहुतेक मुली खूप कोवळ्या वयात भावनेच्या भरात त्यांच्या प्रियकरांच्या मानसिक दबावाला बळी पडून धर्मांतराचा निर्णय घेतात. तेव्हा त्यांना सांगितले जाते की, ’निकाहपुरता’ धर्म बदलायचा आहे. एकदा लग्न झालं की मग ती मुलगी आपापल्या मूळ धर्माच्या चालीरीती पाळू शकते. पळून जाऊन लग्न करणे वगैरे आततायी निर्णय तिने घेतला की माहेरचा उरलासुरला आधारही तिच्यासाठी नष्ट होतो. मग निकाह करून नवऱ्याची मर्जी सांभाळत बसण्याखेरीज तिच्याजवळ दुसरा उपायच नसतो. माझ्या ओळखीच्या एका हिंदू मुलीने असाच वयाच्या १८ व्या वर्षी पळून जाऊन धर्मांतर करून एका मुसलमान मुलाशी निकाह केला. पण काही महिन्यांतच त्या माणसाचे खरे रूप तिला कळून चुकले. तो माणूस तिला मारहाण करायला लागला.

तिच्या सुदैवाने तिथल्याच एका सहृदय मुसलमान शेजारणीने तिला तिच्या माहेरच्या लोकांशी संपर्क साधायला मदत केली आणि त्यांनी येऊन पोलिसांच्या मदतीने तिची सुटका केली. तिने मग रीतसर विधीपूर्वक परत हिंदू धर्म स्वीकारला, वकिलीचा अभ्यास पूर्ण केला आणि आज ती हैदराबादमध्ये ‘प्रॅक्टिस’ करते. ती मुलगी नशीबवान म्हणून त्या सापळ्यातून तिला बाहेर पडता आलं. पण, बऱ्याचदा अशा मुलींना माहेरचा आधार तुटल्यामुळे, आहे त्या परिस्थितीत दिवस काढावे लागतात. प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेत घेत मग ती मुलगी हळूहळू स्वतःच कडवी इस्लाम धर्माभिमानी बनत जाते. प्रख्यात कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांच्या ’आवरण’ या कादंबरीत हा ‘लव्ह जिहाद’ कसा होतो, याचे फार प्रत्ययकारी वर्णन आहे. पत्रकार सुनीला सोवनी यांनी ’लव्ह जिहाद’च्या प्रत्यक्ष केसेसमध्ये अडकलेल्या तरुणी, त्यांचे आई-वडील, सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि मानसोपचारतज्ज्ञ वगैरे लोकांशी बोलून, त्यांच्या मुलाखती घेऊन, विभिन्न घटकांमधल्या, विविध राज्यांमधल्या तरुणींना भेटून ’लव्ह जिहाद- दबलेले भयानक वास्तव’ नावाचे एक छोटे पुस्तक लिहिले आहे. ते वाचले म्हणजे या प्रकरणांमधली सुसूत्रता लक्षात येते. एक म्हणजे या ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) प्रकरणात ज्या मुली प्रामुख्याने फसतात, त्यांच्या घरी कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा अभाव असतो. कधी आई-वडिलांबरोबर संवादाचा अभाव, कधी घरात सतत होणारी भांडणे, कधी भीषण गरीबी, तर कधी मुळातच मुलीचा चंचल, बाह्य झगमगाटाला भुलणारा स्वभाव.

(हेही वाचा – पंतप्रधान Narendra Modi यांचा जमशेदपूरमध्ये RJD, काँग्रेस अन् JMM वर हल्लाबोल)

एकदा ’प्रेम’ प्रकरण सुरू झाले की, दुसरा टप्पा म्हणजे शारीरिक संबंध. सुनीला सोवनींच्या मते हा सगळ्यात धोकादायक टप्पा आहे. प्रेम सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रियकराबरोबर हॉटेलमध्ये किंवा एखाद्या मित्राच्या घरी राहणे, असे करण्यास नकार देणाऱ्या मुलींवर भावनिक दबाव आणला जातो. शारीरिक भूक तर असतेच, त्यामुळे मुलगी प्रियकराबरोबर जायला तयार होते. लग्नाचे वचन तर त्याने दिलेलेच असते. एकदा शारीरिक संबंध आल्यानंतर मग मुलगी फसली जाते. काही वेळा तिचे चित्रीकरण वगैरेही केले जाते. त्यामुळे बाहेर पडायचे मनात आले तरी या प्रकरणातून ती बाहेर पडू शकत नाही. याच दरम्यान निकाहची पूर्वतयारी म्हणून मुलीला इस्लामी रीतिरिवाज पाळायचा आग्रह केला जातो. मुलगी घरी आपल्या आई-वडिलांबरोबर जरी राहत असली तरी तिला आई-वडिलांपासून लपवून नमाज पठण वगैरे करायला सांगितले जाते. वाचायला पुस्तके दिली जातात. शेवटचा टप्पा म्हणजे पद्धतशीर धर्मांतर करवून निकाहनामा करणे. बहुसंख्य मुली आपल्या कायदेशीर हक्कांविषयी अगदीच अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांना धर्मांतर केल्यामुळे आपण कुठल्या हक्कांवर पाणी सोडतोय ते मुळात कळतच नाही. त्यातही एखाद्या शिकलेल्या, जागरूक मुलीने ‘स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट’खाली विवाह करायची गोष्ट काढलीच तर ’मला धर्माचे काही नाही, पण माझ्या आई-वडिलांच्या खुशीसाठी तू एवढेही करू शकत नाहीस का? हेच का तुझे माझ्यावरचे प्रेम?’ वगैरे भावनिक ‘ब्लॅकमेल’ करून मुलीला निकाहनामा करण्यासाठी राजी केले जाते. एव्हाना मुलगी मुलामध्ये मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या इतकी गुंतलेली असते की, ती सारासार विचार करण्याच्या पलीकडे गेलेली असते. मुलीच्या आई-वडिलांना कळलेच तर बऱ्याचदा तेही ’आता ती आम्हाला मेली’ असे म्हणून तिच्याकडे पाठ फिरवतात, त्यामुळे तिच्यापुढे दुसरा काही पर्यायही राहिलेला नसतो. आपल्या मुलीच्या भल्यासाठी उच्च न्यायालयापर्यंत धाव घेणारे अथियाच्या वडिलांसारखे पिता विरळाच.

जरी एखाद्या केसमध्ये मुलीने धर्मांतर केले नाही तरी या विवाहातून होणारी मुले मात्र इस्लाम धर्मीयच असतील, असा अलिखित करार असतो. एव्हाना ‘ब्रेनवॉश’ झालेल्या मुली हे सगळं मान्यही करतात. या सगळ्यासाठी आखाती देशांमधून प्रचंड प्रमाणात पैसा येतो, असे ‘एनआयए’चे म्हणणे आहे. अशा धर्मांतर झालेल्या कित्येक युवती केरळमधून ‘इसिस’च्या ’धर्मयुद्धात’ सामील होण्यासाठी सीरियाला गेल्याच्या केसेस केरळ पोलिसांकडे आहेत. भिन्नधर्मीय विवाह होऊच नयेत, असे कोणीच म्हणणार नाही. २१ व्या शतकात आपला जोडीदार स्वतः निवडायचा हक्क सगळ्यांनाच आहे, पण आपण धर्मांतर करतोय म्हणजे काय करतोय, याची पूर्ण कल्पना धर्मांतर करणाऱ्या मुलींना आहे का? अशा विवाहांमध्ये पैशाची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होते आहे का? असे विवाह करणाऱ्या मुलींचं पुढे काय होतं? नवऱ्याने ‘तलाक’ देऊन हाकलून दिले, तर तिच्यापुढे नक्की कुठला मार्ग असतो? असे विवाह करणाऱ्या लोकांशी कडव्या इस्लामी संघटनांचा नक्की काय संबंध असतो? या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं आहे. म्हणूनच ’लव्ह जिहाद’ (Love Jihad) हे प्रकरण केवळ दोन भिन्नधर्मीय व्यक्तींपुरतेच मर्यादित राहात नाही!

(लेखिका वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन करतात.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.