काळ आला पण वेळ आली नव्हती, १९ तासांनंतर चिमुरड्याची ढिगाऱ्याखालून सुटका

107

काळ आला पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय रायगड दुर्घटनेच्या बचावकार्या दरम्यान आला.  थोडेथोडके नव्हे तर तब्बल १९ तासांनतर साडेतीन वर्षीय मोहम्मद बांगी या चिमुकल्याला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. सोमवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास महाडमधील तारिक गार्डन नावाची 5 मजली इमारत कोसळली. त्यानंतर पोलीस आणि NDRF टीमकडून बचावकार्य सुरू आहे. सकाळी एक मृतदेह बाहेर काढण्यात आला होता त्यांनतर आता एका मुलाला सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.

201

दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू

रायगडमधील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कालचा एक आणि आज चार मृतदेह असे एकूण पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली 18 ते 19 लोक अडकल्याची शक्यता आहे. मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची नुकसानभरपाई दिली जाईल. तर या दुर्घटनेत जखमी झालेल्या 50 हजार रुपये दिले जातील. इमारतीमधील रहिवाशांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल

या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरसह तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, नगरपालिका इंजिनिअर आणि आरसीसी कन्सल्टन्स अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्डर फारूक काझी याच्यासह आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड , अभियंता शशिकांत दिघे यांच्याविरोधात गुन्हा झाला आहे. साधारणपणे पाच वर्षांपूर्वी या इमारतीचं बांधकाम झाल्याची माहिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही इमारत हेलकावे खात असल्याची तक्रार रहिवाशांनी विकासकाकडे केली होती. मात्र, या तक्रारींकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येत आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.