दोन दिवसांत महाराष्ट्र अंधारात?

160

येत्या दोन दिवसांत राज्य गडद अंधारात जाण्याची शक्यता आहे. त्याला कारणही तसेच आहे. राज्यात सध्या केवळ दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. असेच तीन दिवस पुरले इतकेच पाणी शिल्लक आहे. जर केंद्राने राज्याला कोळसा दिला नाही तर मात्र हे विजेचे संकट मोठे होऊ शकते, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.

या वर्षी विजेची मागणी १० टक्क्याने वाढली 

राज्य सरकारने वीज संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी गुजरातमधून ७६० मेगावॅट वीज घेतला आहे, मागील वर्षीच्या तुलनेत ही मागणी १० टक्क्यांनी वाढली आहे. देशात वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळशाचा तुटवडा होत आहे. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी विजेची मागणी १० टक्क्याने वाढली आहे. तर देशात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या तुटवडा असताना देखील महावितरण काळजी घेत आहे की भारनियमन होऊ नये. त्यासाठीच आम्ही तातडीने मंत्रीमंडळाची बैठक घेवून गुजरातमधील एका कंपनीकडून ७६०  मेगाव्हॅट वीज घ्यायला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्यात कशाप्रकारे भारनियमन कमी करता यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी सांगितले.

(हेही वाचा पाकिस्तानचे पंतप्रधान होताच शाहबाजांचा मोदींना काश्मीरवर चर्चा करण्याचा प्रस्ताव)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.