राज्य सेवेतील अधिका-यांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा

102

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट-क किंवा गट-ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. मात्र, गट-अ आणि गट-ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील हे अनुकंपा धोरण लागू करावे, असा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचा-यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

कुटुंबांना मिळणार मोठा दिलासा

कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले असून, अधिकारी संघटनांनी देखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने गुरावारी यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

(हेही वाचाः धक्कादायक! ‘डेल्टा प्लस’चा अर्ध्या महाराष्ट्राला विळखा!)

कुठे होणार नियुक्ती?

गट-अ किंवा गट-ब मधील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट-क किंवा गट-ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल. याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करुन “महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम २०२१” तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे, यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.