म्हणून ‘या’ कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी !

86

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा लोकांना शासकीय पातळीवरच्या सेवा वेळेत देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. जनतेला या सेवा वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. नागरिकांना अधिकार देणारा आणि प्रशासनाला कर्तव्य तत्पर गतीमान करणारा याचबरोबर जबाबदार धरणारा हा कायदा आहे. या कायद्याची राज्यात चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे. तथापि हा कायदा अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी केले.

प्रशासनाची मुख्य जबाबदारी

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय पातळीवरून दिल्या जाणाऱ्या सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत. या सेवा गरजूंना सुलभ आणि तत्परतेने देण्याच्या दृष्टिने महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने कार्य सुरू आहे. आपली सेवा आपले कर्तव्य हे ब्रिदवाक्य शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनातील सेवाभाव जागृत करणारा आहे. हा कायदा अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे सांगून मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने याबाबत चांगले कार्य सुरू असल्याचे समाधान व्यक्त केले.

( हेही वाचा मुंबईकरांनो आता ध्वनीप्रदूषणापासून होणार सूटका! वाचा आयुक्तांचा ‘हा’ मोठा निर्णय )

नागरिकांशी चर्चा

जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांचेही त्यांनी कौतुक करून या अधिनियमाअंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने चिखलवाडी कॉर्नर नांदेड येथे सुरू करण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र आणि अण्णा भाऊ साठे चौक, महाराणा प्रताप चौक येथे प्रत्यक्ष भेट देऊन, तेथील कर्मचारी व लाभार्थी नागरिकांशी चर्चा केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.