शालेय विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार, लवकरच होणार निर्णय

88

शाळा शिकलेल्या प्रत्येकाला गृहपाठ किंवा घरचा अभ्यास हा करावा लागलाच आहे. पण आता याच गृहपाठाच्या बाबतीत राज्य सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत असून लवकरच याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुलांवर अभ्यासाचे अतिरिक्त ओझे देऊ नये. मुलांच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे. गृहपाठ ही शिक्षकांसाठी पळवाट असता कामा नये. कमीत कमी वेळेत पटकन आकलन होईल असे शिक्षण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावे जेणेकरुन त्यांना गृहपाठाची आवश्यकता भासणार नाही. पण हा निर्णय मोठा असून हे माझे व्यक्तिगत मत आहे. याबाबत शिक्षक संघटना आणि संस्था चालक त्यांच्याशी बोलून मग त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षममंत्री दिपक केसरकर यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः आता जनावरांसाठी सुद्धा तयार करणार क्वारंटाईन सेंटर, मुख्यमंत्र्यांची घोषणा)

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचा हेतू

राज्य सरकारकडून जर असा निर्णय घेण्याक आला तर घरी येऊन पुन्हा अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करणे शक्य होईल. विद्यार्थ्यांमध्ये असलेले इतर कलागुण जोपासण्यासाठी आणि त्यांना वाव देण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. आगामी शालेय शिक्षण वर्षापासून हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.