अपघातानंतर तारकर्लीतील पर्यटनाला ब्रेक, मेरिटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

114

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली समुद्रात मंगळवारी बोट बुडून मोठा अपघात झाला. याची गंभीर दखल घेत आता मेरिटाईम बोर्डाने तारकर्लीतील होडी वाहतूक काही दिवसांसाठी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत तारकर्लीतील होडी वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे आता पर्यटकांची चांगलीच निराशा होणार आहे.

तारकर्लीत मोठा अपघात

मालवण जवळील पर्यटनासाठी प्रसिद्ध असणा-या तारकर्ली समुद्रात मंगळवारी फार मोठा अपघात झाला. 20 पर्यटकांसह होडी पर्यटनासाठी गेलेली जय गजानन नावाची बोट बुडून झालेल्या अपघात दोन जणांचा मृत्यू झाला होता. स्कूबा डायव्हिंग करून परतत असताना किनाऱ्यापासून काही अंतरावर बोट बुडाली होती. या बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त माणसं उपस्थित असल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आता मेरिटाईम बोर्डाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली असून, 31 ऑगस्ट पर्यंत हे होडी पर्यटन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

(हेही वाचाः धक्कादायक! मालवणजवळील तारकर्लीत २० पर्यटक असलेली बोट बुडाली)

समुद्रकिनारे बंद करण्याचा निर्णय

यंदा राज्यात पाऊस लवकर येण्याची शक्यता आहे. १० दिवस आधीच मान्सून भारताच्या किनारी पोहोचणार आहे. त्याचे वेध आधीच कोकणच्या किनारी लागले आहेत. त्यामुळे मागील आठवड्यापासून सिंधुदुर्ग, मालवण या भागातील काही समुद्रकिनारे बंद करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.