हे अ‍ॅप नसेल तर तुमचा स्मार्टफोन होणार डब्बा? मोदी सरकार नवा नियम आणण्याच्या तयारीत

84

देशात सर्वत्र 5G इंटरनेट सेवा लवकरच सुरू होणार असल्याने सध्या 5G फोनच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पण स्मार्टफोनच्या बाबत मोदी सरकार एक नवा नियम आणणार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्मार्टफोनमध्ये स्वदेशी नेव्हिगेशन अ‍ॅप बंधनकारक करण्यात येणर असून 1 जानेवारी 2025 पासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

मोदी सरकार लागू करणार नवा नियम?

मोदी सरकारच्या नव्या नियमानुसार 1 जानेवारी 2025 पासून naVIC हे स्वदेशी नेव्हिगेशन अ‍ॅप स्मार्टफोनमध्ये असणे बंधनकारक आहे. सध्या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप इनबिल्ट असते. पण आता मोबाईल उत्पादक कंपन्यांना देखील हे अ‍ॅप इनबिल्ट करणे बंधनकारक असणार आहे. मोदी सरकारच्या अधिका-यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. हे अ‍ॅप जर इनबिल्ट नसेल तर स्मार्टफोन विकता येणार नसल्याचेही कंपन्यांना ठणकावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीचा दादासाहेब फाळके पुरस्काराने होणार गौरव, केंद्रीय मंत्र्यांनी केली घोषणा)

नव्या नियमामुळे होणार बदल

भारतात विक्री होणा-या सर्व स्मार्टफोनमध्ये naVIC अ‍ॅप असावे यासाठी केंद्र सरकार आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे हा नवा नियम लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या नव्या नियमानुसार हार्डवेअरमध्ये महत्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत. यासाठी संशोधन करुन विशेष चाचणी देखील घ्यावी लागणार असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.