मंगळवारी ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट

108
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तसेच पश्चिम किनाऱ्यावरील तटीय द्रोणीय स्थितीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्यासाठी बऱ्यापैकी बाष्प निर्माण झाले आहे. राज्यासाठी मॉन्सून ट्रफही सक्रीय झाल्याने मंगळवारी राज्यातील सात जिल्ह्यांना मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
मंगळवारी पालघर, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर तसेच विदर्भात गडचिरोलीत रेड अलर्ट राहील. मुंबई , ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट राहील. यासह सातारा, मराठावडा, औरंगाबाद, जालना आणि विदर्भात चंद्रपूर येथे अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट राहील. रेड अलर्टच्या तुलनेत ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहते.
( हेही वाचा: मुंबईकरांनो, मंगळवारी ‘लेटमार्क’ची तयारी ठेवा! )

पालघर, नाशिक आणि पुण्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीची दाट शक्यता असल्याने, या भागातील जनजीवनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुजरातला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात अगोदरच सोमवारी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. नाशिकमधील घाट परिसरात पाण्याचा जोर वाढल्याने फटका बसू लागला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.