केंद्र सरकारचा मोठा निर्णय… आता या वयोगटातील लोकांना सुद्धा मिळणार ‘लस’!

येत्या १ एप्रिलपासून यासाठी नोंदणीला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

138

सध्या संपूर्ण देशात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. देशातील नागरिकांकडून सुद्धा या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच आता केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या १ एप्रिलपासून यासाठी नोंदणीला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

देशातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मागणी केली होती. त्यानुसार आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. सध्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षांमधील इतर व्याधी असलेल्या लाभार्थ्यांना लस देण्यात येत आहे.

(हेही वाचाः कोविशिल्ड लस घेताय? मग आता आरोग्य मंत्रालयाचे नवीन निर्देशही वाचा…)

राज्यातील लसीकरणाला गती मिळेल

कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे. विशेषतः ४५ वर्षांवरील तरुण वर्ग कामासाठी बाहेर असतो, त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये सांगितले होते. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यातही महाराष्ट्र लसीकरणात देशात अव्वलस्थानी होते. आतापर्यंत (दि. २२ मार्चच्या आकडेवारीनुसार) राज्यात ४५ लाख ९१ हजार ४०१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.