पंतप्रधानांची तरुणांना दिवाळी भेट; 75 हजार नवनियुक्तीपत्रे कर्मचा-यांना केली सुपूर्द

155

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी केंद्र सरकारच्या 10 लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याता शुभारंभ करण्यात आला. यावेळी 75 हजार युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

रोजगार मेळाव्यात उद्धाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या आठ वर्षांत देशात रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोहीम सुरु आहे. केंद्र सरकारने 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे दिली आहेत.

येत्या 18 महिन्यांच ही सर्व रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. केंद्राचे सर्व विभाग यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सर्व मंत्रालये आणि विभागांना या दिशेने काम करण्याचे निर्देश दिले होते. रोजगार मेळाव्याअंतर्गत, भारत सरकारच्या 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये देशभरातील निवडक तरुणांची नियुक्ती केली जाणार आहे. नव्याने भरती झालेल्या कर्मचा-यांना केंद्र सरकारमध्ये विविध पातळ्यांवर सहभागी करुन घेतले जाणार आहे.

( हेही वाचा: Halal Product: हलाल मांस झटक्यापेक्षा वेगळे कसे? ते जाणून घ्या )

भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. सात- आठ वर्षात आम्ही 10 नंबरवरुन पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. हे शक्य होत होत आहे कारण गेल्या 8 वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेतील ज्या उणिवांमुळे अडथळे निर्माण होत होते, त्या उणिवा आम्ही दूर केल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.