राज्यात १५ हजार रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार

78

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेला गती आली आहे. वर्षभरात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्या प्रमाणे तुमच्या आई वडिलांना तुमची काळजी आहे. तशीच मलाही आहे. एमपीएससी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये. या वर्षात खूप परीक्षा द्यायच्या असल्याने केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना केले.

८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

कोरोनामुळे राज्यातील भरती प्रक्रियेला विलंब झाला होता. यानुसार आता राज्यात १५ हजार जागा भरल्या जाणार असून त्यापैकी ८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच यापुढे एमपीएससी परीक्षांबाबत कोणताही गोंधळ होणार नाही असेही भरणे यांनी सांगितले.

( हेही वाचा : थकीत रक्कम मिळण्याआधीच ७३ सेवानिवृत्त एसटी कर्मचारी, अधिका-यांचा मृत्यू )

अर्हम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांचे संयुक्त विद्यामाने आयोजित स्पर्धा परीक्षा वास्तव, भवितव्य आणि दिशा या विषयावर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शैलेश पगारिया, अहिल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश शेंडगे, महेश बडे, किरण निंभोरे उपस्थित होते. दत्तात्रय भरणे यांचे हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.