खाद्यतेलाचा पुनर्वापर करताय?…तर होऊ शकते कारवाई

121

खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळणे गरजेचे आहे तसेच अखाद्य वापरासाठी वापर करताना आवश्यक अभिलेखा जतन करणे बंधनकारक आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शि.स. देसाई यांनी दिली आहे.

( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर मेगाब्लॉक; परशुराम घाट रोज ५ तास राहणार बंद )

पुर्नवापर करु नये

विविध नियम आणि आदेशात नमूद केल्याप्रमाणे तळलेल्या खाद्यतेलाचा पुर्नवापर टाळणे आवश्यक आहे. तेलाचा शक्यतो तळण्यासाठी एकदाच वापर करावा. तळलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर करताना ट्रान्सफॅट तयार होणे टाळण्यासाठी जास्तीत जास्त ३ वेळेस वापर करावा. न वापरलेल्या तेलामध्ये १५ टक्केपेक्षा जास्त टोटल पोलर कंपाऊंड्स (टीपीसी) आढळता कामा नये. २५ टक्केपेक्षा जास्त टीपीसी आढळून आल्यास त्याचा पुर्नवापर करु नये. असे आदेश सुरक्षा व मानदे (अन्न व्यावसायाचे परवाना व नोंदणी) नियमन २०११ व अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी दिले आहे.

प्रशासनास सहकार्य करावे

५० लिटर पेक्षा जास्त खाद्यतेलाचा तळण्यासाठी वापर करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी खाद्यतेलाच्या पुनर्वापराबाबतचा अभिलेखा जतन करावा. तसेच उपयोगात आलेले खाद्यतेल अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्ली मान्यता प्राप्त संस्थेकडे देण्यात यावे व त्याबाबतचा अभिलेखा जतन करावा अशी तरतूद आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा मानदे कायदा कलम ५५,५७ व ५८ आणि भा.द.वि. कलम २७२ व २७३ नुसार कडक कारवाई करण्यात येईल. खाद्यतेलासंबंधी नियमांचे व तरतुदींचे तंतोतंत पालन करण्यात यावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.