चिंता नको! कोविड मृतांच्या नातलगांना ५० हजार मिळणारच! कसे ते वाचा…

92

मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील कोविड मृतांच्या नातलगांना ५० हजार रुपयांची भरपाई करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. त्याप्रमाणे राज्यभर नोंदणी करण्यात आली, मात्र नोंदणीचे सोपस्कार पूर्ण केले, परंतु प्रत्यक्षात भरपाईचे पैसे मिळतील का, असा संशय वाटत होता. त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने मृतांच्या नातलगांना भरपाई देण्यासाठी ५० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.

( हेही वाचा : शिवजयंती साजरी करताय? वाचा जाहीर झालेली नियमावली! )

प्रत्येकी ५० हजार रुपये 

राज्याच्या महसूल विभागाने जारी केलेल्या नियमावली नुसार आता कोविड मृतांच्या नातलगांना ( जवळच्या नातेवाईकास) प्रत्येकी ५० हजार रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून मंजूर करण्यात आलेल्या १० हजार अर्जदारांना प्रत्येकी ५० हजार याप्रमाणे एकूण ५० कोटी इतकी रक्कम राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे.

2 1

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास राज्या सरकारने मदत करावी अशी मागणी अनेकांनी केली होती. तसेच यासंबंधित याचिकाही उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. यावर राज्यातील कोविड मृतांच्या नातलगांना ५० हजार रुपयांची भरपाई देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. ही रक्कम तातडीने लाभार्थ्यांसाठी वितरीत करावी, असे आदेश सरकारने दिले आहेत. या योजनेखाली लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ही रक्कम संगणकीय प्रणालीद्वारे संबंधितांच्या खात्यात जमा होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.