दोन मॅनहोल्समधील गाळ काढणार पॉवर बकेटद्वारे : देखभालीवर वर्षाला दीड कोटींचा खर्च

124

मुंबईतील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या शहरातील ब्रिटीशकालिन पर्जन्य जलवाहिन्यांमधील गाळ काढण्यासाठी आता मनुष्याला आतमध्ये उतरुन गाळ काढावा लागणार नाही. आजवर बंदिस्त पावसाळी गटारांमधील गाळ मॅनहोल्समधीलच काढला जात होता. त्यामुळे मॅनहोल्समधीलच गाळ काढला जात असल्याने दोन मॅनहोल्समधील गाळ तसाच राहिला जात होता, परिणामी पावसाळी पाणी वाहिन्यांमधील प्रवाह रोखला जावून अनेकदा पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहे. यावर उपाय म्हणून बंदिस्त गटारांमधील गाळ काढण्यासाठी आता पॉवर बकेटचा वापर करण्यात येत असून याच्या देखभालीवर सुमारे दीड कोटींचा खर्च केला जात आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? ‘या’ दोन नावांची चर्चा )

मुंबई शहर व उपनगरात पावसाच्या पाण्याचा निचरा हा पर्जन्य जलवाहिन्यांमधून होत असून शहरांमध्ये ब्रिटीश कालिन पर्जन्य जलवाहिनी असून उपनगरांमध्ये पदपथाखालून बंदिस्त पर्जन्य जलवाहिन्या बनवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या बंदिस्त वाहिन्यांमधील गाळ काढण्यासाठी पॉवर बकेटचा उपयोग केला जात असून दोन मनुष्य प्रवेशिकांमधील अर्थात मॅनहोल्समधील गाळ या पॉवर बकेटच्या माध्यमातून केला जातो. एका मॅनहोल्समधील हे पॉवर बकेट सोडून दुसऱ्या मॅनहोल्समधून ओढण्यात येते. त्यामुळे याद्वारे गाळ काढण्याचे काम मागील वर्षांपासून हाती घेण्यात आहे.

या एक जोडीच्या देखभालीसाठी ४ कामगार, २ फिटर तथा चालक आणि एक मुकादम एवढा कर्मचारी वर्ग कार्यरत असतो. या पॉवर बकेटच्या माध्यमातून ८ तासांच्या पाळींमध्ये ३० मीटर एवढ्या लांबीची पर्जन्य जलवाहिनी साफ केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.