आता 10वीची परीक्षाही रद्द… राज्य सरकारचा मोठा निर्णय!

83

राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार राज्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

काय म्हणाले टोपे?

सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचाः सीबीएसई बोर्डाची १०वीची परीक्षा रद्द! )

वर्षा गायकवाड यांचे ट्वीट

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 12 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला होता. इतरही शिक्षण मंडळांना याबाबत विनंती करण्यात आली होती. त्याप्रमाणे राषट्रीय पातळीवर सीबीएसई आणि आयसीएसई शिक्षण मंडळांनी 10वीच्या परीक्षा रद्द करत केवळ 12वीच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला.त्याचप्रमाणे आता राज्य सरकारनेही निर्णय घेतला आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात येणार असून, या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करता येईल, याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण हवे असतील, त्यांच्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.