हा संप नाही तर दुखवटा! एसटी कर्मचा-यांची वेदना

89

मागच्या दोन ते अडीज महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचा-यांचा संप अद्याप संपलेला नाही. राज्य सरकार आणि एसटी कर्मचा-यांमध्ये अनेक बैठका होऊनही यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचा-यांना सहन कराव्या लागणा-या हाल अपेष्टांना राज्य सरकारच जबाबदार आहे. हा संप नसून एसटी कर्मचा-यांचा दुखवटा असल्याचं कर्मचा-यांचं म्हणणं आहे. तुम्ही एसटी संप संपला असे म्हणा, त्याला आमचा विरोध नाही. आमची मागणी एसटी महामंडळाचे विलीनीकरण व्हावे हीच आहे. ती पूर्ण झाल्याशिवाय हा दुखवटा मागे घेतला जाणार नाही. महाविकास आघाडी सरकामुळेच आमच्यावर चूल बंद करण्याची वेळ आली,अशी संतप्त प्रतिक्रिया स्वारगेट स्थानकावरील संपकरी एसटी कर्मचा-यांनी केली आहे.

सदावर्ते जबाबदार

एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी कृती समितीने सोमवारी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. यावेळी एसटी कर्मचा-यांची चूल बंद करण्याची वेळ एसटी कर्मचा-यांचे वकील सदावर्ते यांनी आणली आहे, असे वक्तव्य समितीचे सुनिल निरभवणे यांना केले, त्यावर आता स्वारगेट स्थानकातील एसटी कर्मचा-यांनी उत्तर दिले आहे.

( हेही वाचा: सरकारकडे अभियंत्याने मागितली रिव्हाॅल्व्हर अन् पंकजा मुंडे संतापल्या…)

फक्त विलीनीकरणावर बोला

सरकारने दिलेला शब्द फिरवला. आम्हाला त्यांचे कोणतेच निर्णय अथवा आवाहन मान्य नाही. यांनीच आजवर राज्यातील सर्व कामगारांवर भीक मागण्याची वेळ आणली आहे. आम्हाला कोणत्याही नेत्याचे काहीही मान्य नाही. विलीनीकरण हीच आमची मुख्य मागणी आहे. परिवहन मंत्र्यांनी आम्हाला कोणतेही आमिष दाखवू नये, फक्त विलीनीकरणावर बोलावे असं संजय मुंडे यांनी संपकरी कर्मचा-यांच्यावतीने सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.