अत्यावश्यक सेवांमध्ये वन विभाग, विमानतळ प्राधिकरणाचा समावेश! 

अत्यावश्यक सेवांमध्ये अन्य सेवांचा समावेश करण्यात आल्या आहे, जर गर्दी कमी झालेली दिसली नाही, तर या सेवा बंद केल्या जातील, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी याआधीच दिला आहे. 

71

महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने १४ एप्रिल, बुधवारपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. ब्रेक द चेन या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी राज्य शासनाने अत्यावश्यक सेवांमध्ये आणखी दोन विभागांचा सहभाग केला आहे. या निर्बंधांनुसार केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून इतर सर्व हालचालींवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत.

याबाबत शासनाने नवा आदेश जारी करत वनविभागातील वेगवेगळी कामे आणि विमान वाहतूक संबंधित कामांना प्रवासासाठी आणि कामासाठी सवलत देत त्यांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश केला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह विभागाशी निगडित इतर व्यवसाय यांना मुभा असणार आहे. त्याचबरोबर विमान सेवेच्या अंतर्गत येणारे विमानतळ देखभाल, कुरियर, केटरिंग, सुरक्षा या सुविधा देणाऱ्या लोकांना सुद्धा अत्यावश्यक सेवेखाली प्रवास करण्यास मुभा दिली जाणार आहे.

(हेही वाचा : बापरे! कोरोनाचा देशात विस्फोट! १० दिवसांतच रुग्ण संख्या २ लाख!)

…तर या सेवा पुन्हा होतील बंद

यापूर्वी या दोन विभागांना अत्यावश्यक सेवेत समावेश न केल्यामुळे काही अडचणी तयार झाल्या होत्या. यामुळे राज्य सरकारच्या वतीने आपत्कालीन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी यासंदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे. दरम्यान, ‘जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी याआधीच दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.