आता टाटा मिठही महागणार?

81

देशात आयोडीनयुक्त घरगुती वापराच्या मिठाची प्रचंड मोठी बाजारपेठ हातात असलेल्या टाटा उद्योगसमुहाने टाटा नमक म्हणजे मिठाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईमुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे टाटा कंझ्युमर प्राॅडक्टसच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. हा निर्णय झाल्यास टाटा मिठाच्या एक किलोचा दर 25 वरुन 28 ते 30 रुपयांवर जाऊ शकतो.

गहू, तांदूळ, पीठे, तेल, वेष्टनातील दूध, दही, पनीर, भाजीपाला जीवनावश्यक वस्तू यांच्या प्रचंड महागाईने सामान्य माणूस आधीच मेटाकुटीला आला आहे. त्यात आता टाटा मिठाचीही भर पडू शकते. टाटा कंझ्युमर प्राॅडक्टसच्या नफ्यात खरे तर अलीकडेच वाढ नोंदवण्यात आली आहे. नफा वाढला असला तरी, टाटा कंझ्युमर मिठाच्या व्यवसायात महागाईच्या कळा सोसत आहे. त्यामुळे टाटा मिठाची दरवाढ करणे अपरिहार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा: १४ ऑगस्टपर्यंत मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा )

टाटा मिठाच्या उत्पादनात दोन प्रमुख घटक असतात. यातील ‘ब्रायन’ च्या किमती स्थित असल्या तरी इंधन दरवाढ झाल्याने, निर्मितीचा खर्च वाढला असून, त्यामुळे नफा कमी होत चालला आहे. यावर दरवाढ हा एक प्रस्तावित उपाय असल्याचे, डिसूझा यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.