ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा! ‘या’ भागात पाणी पुरवठा बंद

83

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत बारवी गुरुत्व जलवाहिनीचे देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने गुरुवार, २७ जानेवारी २०२२ रोजी रात्री १२.०० ते शुक्रवार, २८ जानेवारी,२०२२ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत ठाणे शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या भागाचा पाणी पुरवठा बंद

ठाणे शहरात दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत मुंब्रा बायपासपासून मुंब्रा फायरब्रिगेडपर्यंत (किस्मत कॉलनी, चांद नगर, एम.एम. व्हॅली, अमृतनगर, अल्मास कॉलनी) तसेच कळवा प्रभाग समितीमधील काही भाग व कोलशेत, वागळे इस्टेटमधील काही परिसराचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे.

(हेही वाचा स्वस्त मस्त BEST! ‘या’ सुपर सेव्हर योजना करणार प्रवाशांची बचत!)

या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा

या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.