राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; प्रस्तावावर मंत्रिमंडळाची मोहोर

154

राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करत त्यांना बक्षी समितीच्या अहवालानुसार, वेतनवाढ देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे.

राज्य वेतन सुधारणा समितीचा (बक्षी समिती) अहवाल खंड-२ मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला. अनेक पदांच्या वेतनात असलेल्या त्रुटी दूर करण्याची शिफारस त्यात करण्यात आली होती. या निर्णयाचा लाभ राज्य सरकारच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणार असून, राज्याच्या तिजोरीवर २४० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

  • महानगरपालिकांमध्ये नामनिर्देशित पालिका सदस्यांच्या संख्येत सुधारणा करणार
  • संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ अनाथांपर्यंत पोहचवण्यासाठी तर्पण फाऊंडेशन समवेत करणार
  • शासकीय जमिनीवर बेकरी व्यवसायासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीस मॉडर्न फूड एंटरप्राइझेसबरोबर व्यावसायिक करारास मान्यता
  • गुरे-ढोरे रस्त्यावर ने -आण करण्यासंदर्भात आता कैदेऐवजी दंडाची तरतूद
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.