गणपतीक गावाक जावचा हा? तर ही बातमी वाचा…

75

गणेशोत्सव… कोकणात हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गावाला जाण्यासाठी तर चाकरमानी तीन ते चार महिन्यांपासून नियोजन करत असतात. पण ब-याचदा तिकीट बुकिंग सुरू झाल्या झाल्या सर्व गाड्या फूल होतात. मात्र, आता कोकण रेल्वेने विशेष 72 गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

रावसाहेब दानवे यांची माहिती

यावर्षीच्या गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस /पनवेल आणि सावंतवाडी रोड/ रत्नागिरी दरम्यान विशेष 72 गाड्या चालवणार आहोत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

(हेही वाचाः खुशखबर… लवकरच एमपीएससीतर्फे पदांची भरती होणार)

अशा असणार फे-या

गणेश उत्सवासाठी मुंबईतून आपआपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासियांची प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल आणि सावंतवाडी रोड/रत्नागिरी दरम्यान विशेष 72 गाड्या चालवणार आहोत. CSMT- सावंतवाडी रोड डेली स्पेशल, या गाडीच्या एकूण 36 ट्रिप होतील. तसेच CSMT- रत्नागिरी बाय विकली स्पेशल, या गाडीच्या 10 ट्रीप होणार आहेत. पनवेल-सावंतवाडी रोड ट्राय विकली स्पेशल या गाडीच्या 16 ट्रीप होतील आणि पनवेल रत्नागिरी बाय विकली स्पेशल, या गाडीच्या एकूण 10 ट्रीप होणार आहेत, असे दानवे यांनी सांगितले.

अजूनही गाड्या सोडणार

प्रत्येकाने कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर प्रवासादरम्यान कोरोना प्रतिबंधक नियम पाळलेच पाहिजेत. 72 गाड्या सोडूनही जर वेटींग असेल, प्रवासाची अडचण होत असेल तर भारत सरकार रेल्वे मंत्रालय अजूनही गाड्या सोडेल, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला दिले आहेत. मात्र कोकणवासीयांची प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेत असल्याचे ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.