ट्रेनला उशीर झाला तर तिकीटाचे सर्व पैसे होणार रिफंड; रेल्वेमंत्र्यांची घोषणा

132

रेल्वेने प्रवास करणा-यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एक्स्प्रेसने प्रवास करत असाल आणि तुमच्या गाडीला उशिर झाला तर तुम्हाला मोठा दिलासा रेल्वेने दिला आहे. तुम्ही प्रवास करत असणाऱ्या एक्स्प्रेसला तीन तासांपेक्षा जास्त उशिर झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे रिफंड मिळणार आहेत. एवढेच नाही तर नाश्ता- जेवणही फ्री मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

अनेकदा एक्स्प्रेस विविध कारणांमुळे उशिरा धावत असतात. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात तिकीट रद्द केल्यास पूर्ण रिफंड मिळत नाही. पण आता यात बदल करण्यात आला आहे. आता 3 तास ट्रेन उशिराने असल्यास, तिकीटाचे संपूर्ण पैसे मिळणार आहेत. मग ती तिकीट कन्फर्म असो किंवा मग RAC.

तिकिटाची संपूर्ण रक्कम मिळणार परत

हिवाळ्यात अनेकदा धुक्यात गाड्या उशिराने धावतात. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पंरतु अशा परिस्थितीत रेल्वे तुम्हाला अनेक सुविधा देते. मात्र, आता तुमची गाडी तीन तास उशिराने असेल तर तिकीट परताव्याची संपूर्ण रक्कमही परत केली जाणार आहे.

( हेही वाचा: MSRTC चा मोठा निर्णय; मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर धावणार नाही ‘लालपरी’ )

जेवण आणि पाणीदेखील मोफत

तुम्ही काऊंटवरवरुन किंवा ऑनलाईन तिकीट बुक केली असेल तरी तुम्हाला संपूर्ण परतावा मिळेल किंवा तुमची ट्रेन उशिरा झाली तर तुम्हाला मोफत खाण्यापिण्याची सुविधा मिळेल. पण ही सुविधा तुम्हाला काही ठराविक रेल्वेमध्येच मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.