10 वर्षांपासून दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना नाही

वेळीच कार्यवाही झाली असती, तर डोंगराळ भागात राहणा-या नागरिकांच्या मृत्यूला रोखता आले असते.

68

मुंबईतील दरडी कोसळून होणारी जीवित आणि वित्तहानी नवीन नसून, मागील 10 वर्षांपासून दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही. मागील 29 वर्षात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 290 लोकांचा मृत्यू झाला असून, 300हून अधिक नागरिक जखमी झाले.

9 हजार 657 झोपड्यांना स्थानांतरित करण्याची शिफारस

मुंबईतील 36 पैकी 25 मतदारसंघात 257 ठिकाणे डोंगराळ भागात धोकादायक म्हणून वर्गीकृत आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की, या भागातील 22 हजार 483 झोपड्यांपैकी 9 हजार 657 झोपड्यांना प्राधान्याने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य शासनाला केली. यात उर्वरित झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचे प्रस्तावित केले होते. पावसाळ्यात भूस्खलनामुळे 327 ठिकाणांबाबत अनिल गलगली यांनी महाराष्ट्र सरकारला आधीच सतर्क केले होते.

(हेही वाचाः मुंबईतील चेंबूर, विक्रोळी परिसरात मोठ्या दुर्घटना! घरे कोसळून अनेकांचा मृत्यू)

नागरिकांच्या मृत्यूला रोखता आले असते

1992 ते 2021 दरम्यान दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 290 लोकांनी जीव गमावला असून, 300हून अधिक जण जखमी झाले आहेत. 2010 मध्ये सर्वसमावेशक सर्वेक्षण करणार्‍या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने शिफारस केली होती आणि त्यावर वेळीच कार्यवाही झाली असती, तर डोंगराळ भागात राहणा-या नागरिकांच्या मृत्यूला रोखता आले असते.

कोणताही अ‍ॅक्शन टेकिंग प्लॅन नाही

मंडळाचा अहवाल आणि अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर 1 सप्टेंबर 2011 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. तथापि, त्यानंतर दहा वर्षे उलटून गेली आहेत परंतु नगरविकास विभाग अद्याप त्याची अंमलबजावणी करत आहे, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे यापैकी कोणताही अ‍ॅक्शन टेकिंग प्लॅन (एटीपी) तयार केलाच नाही, असे गलगली म्हणाले.

(हेही वाचाः विहार तलावही भरला, मुंबईकरांना पाणी तुंबण्याची भीती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.