औरंगाबाद मध्ये खळबळ, दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

79

औरंगाबाद येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बालगृहातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 14 ऑगस्ट रोजी दुपारी हे अपहरण करण्यात आले असून या दोन्ही मुलींचा पोलिस शोध घेत आहेत.

पोलिसांत गुन्हा दाखल

या अपहरण प्रकरणात बालगृहाच्या सिस्टर मंगल शहाराव यांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 14 ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते साडेतीनच्या सुमारास 16 आणि 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलींना बालगृहातून एका अज्ञात इसमाने पळवून नेल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान बालगृह प्रशासनाने आप्त,नातेवाईक अशा सर्व ठिकाणी शोध घेतला. पण त्यांचा पत्ताच न लागल्यामुळे अखेर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नुकताच कन्नड येथे शेतमजुरी करणा-या एका अल्पवयीन मुलीला सहा नराधमांनी रस्त्यात अडवून तिच्यावर बलात्कार केला होता. ही घटना ताजी असतानाच ही घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने बघणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या दोन्ही अल्पवयीन मुलींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.