मुंबई लोकल सर्वांसाठी बंदच! लेव्हल ३ची बंधने लागू! 

मुंबईत सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी त्यानंतर संचारबंदी लागू होणार.

86
राज्य सरकारने शुक्रवारी, ४ जून रोजी रात्री उशिरा अनलॉकची घोषणा केली, तसेच त्यासाठी ५ लेव्हलमध्ये जिल्ह्यांची विभागणी केली. रुग्णांची पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड व्याप्तीनुसार ही लेव्हल ठरवण्यात आली. त्याचवेळी सरकारने राज्य सरकारने अनलॉक बाबत जे मार्गदर्शन तत्वे ठरवून दिली आहेत. त्यात स्थानिक प्रशासन त्यात बदल करू शकते, असे शासनाने म्हटले आहे. त्याचा फायदा घेत सरकारच्या लेव्हल ३ मधील जिल्ह्यांमध्ये लोकल रेल्वे ह्या वैद्यकीय, अत्यावश्यक आणि महिलांसाठी सुरु करावी, असे म्हटले आहे. मात्र मुंबई महापालिकेने त्यातून महिला शब्द वगळल्याने लोकल रेल्वे कालप्रमाणेच वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवांसाठीचा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत ७ जूनपासून या गोष्टी सुरु राहणार! 

  • अत्यावश्यक दुकाने सर्व दिवस सकाळी ७ ते ४ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ सर्व खुले राहतील
  • माॅल्स थिएटर्स सर्व बंद राहतील
  • हाॅटेल्स सोमवार ते शुक्रवार ५० टक्के सायंकाळी ४ पर्यंत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील
  • लोकल रेल्वे बंद राहतील
  • मॉर्निंक वाॅक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा
  • खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील
  • शासकीय कार्यालय ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील
  • आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते रात्री ९.
  • स्टुडियोत चित्रीकरण परवानगी
  • मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के सायंकाळी ४ पर्यंत, सोमवार ते शुक्रवार.
  • लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोक मुभा असतील
  • बांधकाम सायंकाळी ४ वाजेपर्यंत मुभा
  • कृषी सर्व कामे मुभा
  • ई काॅमर्स सुरु ठेवू शकतो
  • जमावबंदी सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यानंतर संचारबंदी

(हेही वाचा : धक्कादायक! केरळमध्ये लसीकरणासाठी मुसलमानांना ‘फ्रंट लाईन वर्कर’ घोषित!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.