लातूरच्या (Latur) औसा तालुक्यातील बुधोडा गावातील २५ शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्यूनलकडून (Waqf Tribunal) नोटिसा मिळाल्या आहेत. गावातील जवळपास १५० ते १७५ एकर जमिनीवर दावा सांगण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे राहणाऱ्या समशाद अझगर हुसैन यांनी वक्फ न्यायाधिकरणाकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीवरून वक्फ ट्रिब्यूनलने (Waqf Board) बुधोडा गावातील शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत.
(हेही वाचा – छळ करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणता येणार नाही: Supreme Court चे महत्त्वाचे निर्देश)
आमची चौथी पिढी शेतात राबतेय
वक्फच्या या पाशवी कृत्याविरोधात आम्ही २५ शेतकऱ्यांनी मिळून एक वकील नेमला आहे. विनाकारण त्रास देण्याचं काम आहे. १९५५ साली माझ्या आजोबांच्या नावे जमीन लागली होती. आता आमची चौथी पिढी शेतात राबतेय आणि आज अचानक दावा ठोकला जातोय, असे पीडित शेतकरी राजेश बुधोडकर यांनी म्हटले आहे.
तारीख निघून गेल्यानंतर नोटीस आली
अलीकडेच अहमदपूरच्या तळेगावातील शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाकडून नोटिसा आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका गावात हाच प्रकार समोर आला आहे. या गावातील शेतकरी राजेश बुधोडकर यांनी सांगितले की, आम्हाला ही नोटीस तारीख निघून गेल्यानंतर आली होती. मात्र या महिन्यात ४ डिसेंबरला आम्ही हजर झालो. आम्हाला पुढची तारीख २८ डिसेंबर दिली आहे. बुधोडा गावातील २५ शेतकऱ्यांच्या १५०-१७५ एकर जमिनीवर दावा करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वक्फकडून शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच लातूर जिल्ह्यातील तळेगाव इथल्या ३०० एकर जमिनीवर वक्फने दावा केला आहे. वक्फची संपत्ती इस्लामी कायद्यानुसार केवळ धार्मिक आणि लोकोपयोगी कामासाठी वापरली जाऊ शकते. त्यातून वक्फ ट्रिब्यूनलकडे आलेल्या तक्रारीवरून लातूरमधील १०३ शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली. या जमीन वादात सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानंतर आता बुधोडमध्येही हाच प्रकार घडला आहे. (Waqf Board)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community