अलर्ट! शुक्रवारी पाणीपुरवठा 8 तासांसाठी राहणार बंद

93

महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व जलवाहिनीचे तातडीचे देखभाल व दुरूस्तीचे काम एम.आय.डी.सी ने घेतले आहे. यामुळे शुक्रवार दिनांक ५ ऑगस्ट २०२२ रोजी ठाणे शहरात दुपारी १२.०० ते सायंकाळी ८ वाजेपर्यत महापालिका क्षेत्रातील दिवा प्रभाग समिती व मुंब्रा प्रभाग समितीमधील मुंब्रा बायपास पासून मुंब्रा फायर ब्रिगेडपर्यत (किस्मत कॉलनी, चांदनगर, एम.एम.व्हॅली, अमृतनगर, अल्मास कॉलनी) तसेच कळवा प्रभाग समितीमधील काही भाग व कोलशेत, वागळे इस्टेटमधील काही परिसरात आठ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

( हेही वाचा : अधिवेशनाची तयारी : मंत्रिमडळ विस्ताराआधीच संभाव्य मंत्र्यांकडून खात्यांचा अभ्यास सुरू)

महापालिकेचे आवाहन

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पुर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.